प्रतिनिधी / सांगली
केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन कृषी कायद्यांविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले आहे. सोमवारी दि. २५ रोजी सांगली ते कोल्हापूर अशा ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
नव्या जाचक कृषी कायद्यांविरोधात देशभर योजण्यात येत असलेल्या आंदोलनाचाच एक भाग म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली या ट्रॅक्टर मोर्चाची हाक दिली आहे. सांगलीतील विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा ते कोल्हापुरातील दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज पुतळा अशी ही रॅली आयोजित करण्यात आली आहे.