प्रतिनिधी/ सातारा
सहकारमंत्री यांच्या सह्याद्री साखर कारखाना, जयवंत शुगर, अजिंक्यतारा साखर कारखाना यांची ऊस वाहतूक सातारा तालुक्यात ऊस दर जाहीर न केल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना व ऊस उत्पादक शेतकरी यांनी गुरूवारी सातारा तालुक्यातील जावळवाडी फाटा येथे अडवली. व जोपर्यंत एकरकमी ऊस दर जाहीर करणार नाही तोपर्यंत कारखाना चालु होऊ देणार नाही जर चालवला तर संचालकाच्या दारात शिमगा आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी शेतकरी संघटनेचे राजु शेळके यांनी दिला.
याप्रसंगी कामेरी, वेणेगाव, कोपर्डे, नांदगाव, वारणानगर, निसराळे आदी परिसरातील शेतकरी यावेळी एकवटले होते. सध्या मालक तुपाशी व शेतकरी उपाशी अशी काहीशी गत ऊस उत्पादक शेतकऱयांची झाली आहे. कारखान्यातील कर्मचाऱयांना पगारवाढ देण्याकरीता, दिवाळी बोनस देण्याकरीता यांच्याकडे पैसे आहेत. मागील 50 वर्षात कधी आडवणुक आम्ही केली नाही. पण सध्या महागाई गगणाला भिडली आहे, अशा परिस्थितीत मग शेतकऱयांच्या उसाला एकरकमी दर जाहीर काय करण्यात येत नाही असा सवाल येथे उपस्थित असलेल्या सहय़ाद्री साखर कारखान्याचे संचालक संजय कुंभार यांना केला. यावेळी संजय कुंभार यांनी उद्यापर्यंत आम्ही दर जाहीर करताने, दर जाहीर न झाल्यास उसाची उचल करण्यात येणार नाही असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. त्यानुसार पोलिसांचा बंदोबस्तीत गुरूवारी ऊस हा कारखान्यांकडे घेऊन जाण्यात आला.
तसेच शेतकऱयांचा कारखाना असुन शेतकऱयांना आता काही किम्मत उरली नसल्याचे दिसत आहे. मागील वर्षा ही 2919 रूपये दर जाहीर झाला होता. पण केवळ 2600 रूपयेच शेतकऱयांना देण्यात आली. 1966 कायदेशीर नियमाने व्याजदरासह एफआरपी रक्कम देणे बंधनकारक असते पण ते देण्यात आले नाही. कायद्याप्रमाने एकरकमी एमआरपी, व मागील एफआरपीचे व्याज द्यावे, अशी मागणी ही यावेळी शेतकऱयांकडून करण्यात येत होती.