प्रतिनिधी / जयसिंगपूर
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशातील शेतकरी अन्नधान्य निर्मितीसाठी अहोरात्र झटतो आहे. त्याला प्रेरणा मिळावी यासाठी कोरोना अन्नदाता शेतकरी योध्दा हा सन्मान करून शेतकरी सन्मान दिवस साजरा करण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच नेते राजू शेट्टी यांनी आपल्या शिरोळ येथील शेतामध्ये सहकुटुंब कृषि औजारे हातात घेऊन गर्व आहे मला शेतकरी असल्याचा अशा घोषणा दिल्या.
कोरोना विषाणू देशात हाहाकार माजवलेला आहे. या पार्श्वभूमीवर देशातील 12 कोटी शेतकरी व 15 कोटी शेतमजूर लोकांना अन्नधान्य मिळावे म्हणून अहोरात्र शेतात झटतो आहे. फायदा अथना नुकसानीची काळजी न करता तसेच कोरोना विषाणू न घाबरता शेतात कष्ट करतो आहे. डॉक्टर, पोलिस, आरोग्य कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला.
त्यांचे योगदान हे बहुमूल्यच आहे. शेतकरीही रात्र दिवस कष्ट करून अन्नधान्य पिकवून देशातील धान्याचे कोठारे भरून काढतो आहे. त्यांचा सन्मान म्हणून अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या माध्यमातून देशातील शेतकर्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी शेतकरी सन्मान दिवस साजरा करण्यात आला. राज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून विविध जिल्ह्यातील शेतकर्यांनी हा दिवस साजरा केला. या बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, देशातील बळीरादजा हा अन्नदाता आहे. कोरोनाला घाबरून तो घरात बसलेला नाही.
उलट शेतात अहोरात्र कष्ट करून देशतील जनतेला अन्नधान्य देतो आहे. केंद्र सरकारने शेतकर्यांना कर्ज नको तर कर्जमुक्ती हवी आहे, हे समजावून घेतले पाहिजे. मोदी सरकारने शेतकर्यांना कर्जमुक्त करावे, जेणेकरून देशातील शेतकरी पुन्हा उभा राहिल. मुळात शेतकर्यांना बँका कर्ज द्यायला तयार नसतात. त्यांना दारात देखील थांबवून घेत नाहीत. गतवर्षी 12 लाख कोटीहून अधिक पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये 15 लाख कोटीची तरतूद केली आहे. त्यातीलच 4 लाख कोटीच्या तरतूदीने काहीच फरक पडणार नाही. शेतकर्यांची कर्जमुक्ती, दीटपट हमीभाव, वीज बील माफी आदीयोजना राबवल्या तरच तो उभा राहील.