बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक विधानसभेतील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी त्यांचा पक्ष विधानसभेत आणि बाहेर शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरूद्ध लढा देणार असल्याचे म्हंटले आहे.
सिद्धरामय्या यांनी शेतकरी स्वत: शेती कायद्यास विरोध करीत आहेत, परंतु मोदी सरकार अंमलबजावणी करण्यावर का ठाम आहे, असा सवाल करून त्यांनी शेतकऱ्यांवर परिणाम करणाऱ्या कायद्यावर टीका केली आहे.
दरम्यान ट्वीटच्या माध्यमातून सिद्धरामय्या यांनी भाजप नेतृत्वावर शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप केला.सिद्धरामय्या यांनी @PMOIndia @narendramodi म्हणतात एपीएमसी राहतील. कोण सत्य सांगत आहे आणि कोण शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहे ?, असे ते म्हणाले.