मच्छे-वाघवडे-किणये भागातील शेतकरी दिवसा थ्रीफेज वीजपुरवठय़ासाठी मुख्य कार्यालयावर देणार धडक : रात्री वीजपुरवठय़ाचा त्रास
वार्ताहर /किणये
मच्छे-किणये भागातील शेतकऱयांना दिवसा थ्रीफेज वीजपुरवठा द्या, अशी मागणी गेल्या दोन महिन्यांपासून हेस्कॉमकडे करण्यात येत आहे. तालुका म. ए. समितीच्यावतीने पुन्हा सोमवारी हेस्कॉमच्या अधिकाऱयांना निवेदन दिले आहे. या भागात दिवसा वीजपुरवठा द्या. अन्यथा, दि. 24 रोजी विराट मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.
रात्रीच्या वेळी थ्रीफेज वीजपुरवठा करण्यात येत असल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. आम्ही रात्रीच्या अंधारात शेतशिवारातील पिकांना पाणी कसे द्यायचे, असा सवाल शेतकरीवर्गातून उपस्थित करण्यात येत आहे.
मच्छे, पिरनवाडी, संतिबस्तवाड, झाडशहापूर, वाघवडे, किणये, रणकुंडये, शिवनगर, बहाद्दरवाडी, नावगे, कर्ले, जानेवाडी या भागात रात्रीच्या वेळी थ्रीफेज वीजपुरवठा करण्यात येतो, अशी माहिती शेतकऱयांनी दिली.
गेल्या महिन्यापासून तालुका म. ए. समितीच्यावतीने हेस्कॉम अधिकाऱयांना निवेदन देण्यात आले होते. पुन्हा सोमवारी हेस्कॉमचे मुख्य अधिकारी चिकार्डे यांना तालुका म. ए. समितीच्यावतीने निवेदन देऊन येत्या 23 पर्यंत या भागातील शेतकऱयांच्या समस्या जाणून घेऊन दिवसा थ्रीफेज वीजपुरवठा द्या. अन्यथा, आम्ही 24 रोजी हेस्कॉमच्या मुख्य कार्यालयावर विराट मोर्चा काढू, असा इशारा देण्यात आला आहे.
सोमवारी निवेदन देताना माजी आमदार मनोहर किणेकर, एपीएमसी माजी सदस्य आर. के. पाटील, महादेव मंगणाकर, मल्लाप्पा गोरल, महादेव बिर्जे, नागेंद्र पाटील, शिवाजी आंबोळकर, जोतिबा आंबोळकर, मल्लाप्पा पाटील, विनायक पाटील, अनिल पाटील आदींसह शेतकरी उपस्थित होते.
मच्छे-किणयेचे शेतकरी संतप्त
यापूर्वी मच्छे-किणये भागात पहाटे 5 ते सकाळी 10 व रात्री 10 ते 12 पर्यंत 7 तास थ्रीफेज वीजपुरवठा देण्यात येत होता. याचा शेतकऱयांना त्रास सहन करावा लागत होता. रात्रीच्या वेळी थ्रीफेज वीजपुरवठा केल्यास आम्ही शेती करायची कशी? पिके घ्यायची कशी? अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकरीवर्गातून व्यक्त करण्यात आल्या.
या भागात ऊस, बटाटा, बिन्स, मिरची, कोबी, फ्लॉवर, गाजर, काकडी, कोथिंबीर, लाल भाजी, मेथी व इतर भाजीपाला पिके उन्हाळय़ात घेण्यात येतात. रात्रीच्या वेळी थ्रीफेज वीजपुरवठा करण्यात येत असल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. सोमवारी दिलेल्या निवेदनाचा व शेतकरी मोर्चा काढणार असल्याने हेस्कॉमच्या अधिकाऱयांकडून वाघवडे व मच्छे भागात दिवसा वीजपुरवठा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मच्छे व झाडशहापूर परिसरात बुधवार दि. 16 रोजी दुपारी 12 ते 5 पर्यंत थ्रीफेज वीजपुरवठा देण्यात आला. वाघवडे येथे सकाळी 6 ते 11 पर्यंत वीजपुरवठा देण्यात आला. वीजपुरवठा देण्याची ट्रायल सुरू करण्यात आली आहे.
मच्छे-झाडशहापूरच्या शेतकऱयांना वीजपुरवठय़ाची ट्रायल अमान्य
मच्छे व झाडशहापूर येथील शेतकऱयांनी हेस्कॉम विभागीय कार्यालयाला बुधवार दि. 16 रोजी हेस्कॉमचे अधिकारी लोबो यांना निवेदन दिले. मच्छे व झाडशहापूर भागात यापूर्वी पहाटे 5 ते 10 या वेळेत थ्रीफेज वीजपुरवठा देण्यात येत होता. दि. 16 रोजीपासून दुपारी 12 ते 5 या वेळेत हा वीजपुरवठा सुरू करण्यात आला असून ही वेळ या दोन्ही गावांतील शेतकऱयांसाठी अनुकूल नाही, असे निवेदनात म्हटले आहे. मच्छे व झाडशहापूर भागात भाजीपाला पिके अधिक प्रमाणात घेण्यात येतात. यामुळे मच्छे व झाडशहापूर भागात सकाळी 6 ते दुपारी 1 पर्यंत वीजपुरवठा द्या, अशी मागणी केली.
निवेदन देताना सुरेश लाड, हणमंत बेळगावकर, भरमाण्णा नंदिहळ्ळी, कल्लाप्पा गोरल, गजानन अनगोळकर, यल्लाप्पा नंदिहळ्ळी, परशराम गोरल, निखिल गोरल, सावंत पाटील, आनंद अनगोळकर, मोहन सावंत आदींसह मच्छे व झाडशहापूर येथील शेतकरी उपस्थित होते.
दि. 24 रोजी शेतकऱयांच्यावतीने काढण्यात येणाऱया मोर्चासंदर्भात वाघवडे गावात सोमवारी रात्री बैठक घेण्यात आली. या भागातून मोर्चाला मोठय़ा संख्येने सहभागी होण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
या बैठकीला आर. के. पाटील, भावकाण्णा पाटील, सुभाष देसाई, रघुनाथ नाईक, नागेंद्र पाटील, जोतिबा आंबोळकर, कल्लाप्पा गुरव, दुर्गाप्पा कांबळे, नागनाथ बुवाजी, प्रकाश वाणी, कामाण्णा कणबरकर आदी शेतकरी उपस्थित होते.
तोडगा काढण्याचा अधिकाऱयांचा प्रयत्न
मच्छे औद्योगिक वसाहतीला अधिक वीजपुरवठा करावा लागतो. त्यामुळे या भागातील शेतकऱयांना वीजपुरवठय़ाचा त्रास होतो. आम्ही वरिष्ठ अधिकाऱयांना सांगून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करू, अशी माहिती हेस्कॉमच्या अधिकाऱयांनी दिल्याचे मच्छे व झाडशहापूर येथील शेतकऱयांनी सांगितले.
ऊर्जामंत्र्यांच्या सूचनेकडे हेस्कॉमचे दुर्लक्ष
कर्नाटकच्या ऊर्जामंत्र्यांनी शेतकऱयांना सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत वीजपुरवठा द्या, असे सांगितले असताना हेस्कॉमकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. यासाठी शेतकऱयांनी एकजुटीने मोर्चाला मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आर. के. पाटील यांनी सांगितले.