कित्तूर चन्नम्मा चौक येथे दोन तास रास्तारोको : 25 ऑक्टोबर रोजी पुन्हा साखर कारखानदारांबरोबर बैठक
प्रतिनिधी /बेळगाव
ऊस दरासाठी जिल्हा प्रशासनाने शेतकऱयांची बैठक घेतली. मात्र ती बैठक पूर्णपणे फिसकटली. त्यामुळे शेतकऱयांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढण्याचा निर्धार केला होता. त्यानुसार संपूर्ण जिल्हय़ातील शेतकऱयांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून आपली ताकद दाखवून दिली. जोपर्यंत ऊसदर निश्चित केला जात नाही. तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवू, असा इशारा शेतकऱयांनी दिला आहे.
कित्तूर चन्नम्मा चौक येथे तब्बल दोन तास रास्तारोको केला. त्यानंतर संरक्षण भिंतीवरून उडी मारून शेतकऱयांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच ठाण मांडले. यामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. पेट्रोल, डिझेल यासह इतर वस्तूंचे दर चारपटीने वाढले. मात्र उसाचे दर जैसे थे ठेवण्यात आले आहेत, हा कुठला न्याय. महागाईप्रमाणे ऊस दरही वाढलेच पाहिजेत. केंद्र सरकारने जाहीर केलेली एफआरपी ही अन्यायकारक आहे. तेव्हा या एफआरपीशी आम्ही सहमत नाही. आम्हाला येथील साखर कारखानदारांनी 3 हजार 500 रुपये प्रतिटन दर दिलाच पाहिजे. अन्यथा तीव्र आंदोलन सुरूच राहील, असा इशारा देण्यात आला. बऱयाच उशीरानंतर जिल्हाधिकारी मोर्चासमोर आले. त्यांनी 25 ऑक्टोबर रोजी पुन्हा साखर कारखानदार आणि साखर आयुक्तांची बैठक होईल. त्यामध्ये निर्णय घेतला जाईल. याचबरोबर तुमच्या मागण्यांचा सरकारकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन जिल्हाधिकाऱयांनी दिले आहे.
केंद्र सरकारने जाहीर केलेली एफआरपी ही अन्यायकारक आहे. कारण साखरेच्या उताऱयामध्ये पूर्वीचा उतारा होता; त्यापेक्षा वाढ करण्यात आली आहे. एक प्रकारे शेतकऱयांची दिशाभूल केली आहे. त्यामुळेच आता येथील शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. जिल्हा प्रशासनाबरोबर काही दिवसांपूर्वी बैठक झाली. त्या बैठकीमध्ये शेतकऱयांनी प्रतिटन 3 हजार 500 रुपये दर द्यावा, याचबरोबर ऊसतोड आणि वाहतुकीचा खर्च कारखान्यानेच द्यावा, अशी मागणी केली होती.
त्यावर जिल्हाधिकाऱयांनी याबाबत साखर आयुक्तांशी चर्चा करू, असे सांगितले. मात्र शेतकऱयांनी साखर आयुक्तांशी चर्चा करून त्याचा काहीच उपयोग होणार नाही तर साखरमंत्र्यांशी तसेच मुख्यमंत्र्यांशी आमची चर्चा घडवा, अशी मागणी केली होती. जिल्हा पंचायतमध्ये झालेल्या या बैठकीनंतर शेतकऱयांनी आम्ही आंदोलन छेडणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार शेतकऱयांनी हा मोर्चा काढला आहे. या मोर्चामुळे या परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती.
जिह्यातील विविध तालुक्मयांमधून मोठय़ा संख्येने शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दाखल झाले होते, तर काही शेतकरी किल्ला तलावापासूनच मोर्चाने आले होते. त्यांनी कित्तूर चन्नम्मा चौक येथे रास्तारोको केला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. शेतकऱयांच्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात शेतकऱयांनी तीव्र घोषणाबाजी केली. आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशाराही दिला. शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच ठाण मांडून बसले. यावेळी महिलाही मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या. जिल्हाधिकारी कार्यालय तसेच कित्तूर चन्नम्मा परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी ती कोंडी सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र सर्वत्रच वाहतूक खोळंबलेली आढळून आली.
भर पावसातच हे शेतकरी आंदोलन सुरू होते. त्यामुळे पोलिसांचीही चांगलीच तारांबळ उडाली होती. शेतकरी जोरदार घोषणाबाजी करत होते. त्यामुळे हा परिसर दणाणून गेला होता. आम्ही शेतामध्ये राबायचे आणि दर दुसऱयांनी ठरवायचा? हा कोणता न्याय? असे शेतकरी तीव्र शब्दात सांगत होते. दरवषीच ऊसदर देताना अनेक साखर कारखाने शेतकऱयांवर अन्याय करत आहेत. काही साखर कारखानदार तर ऊस बिले देण्यास तब्बल दोन ते तीन महिने उशीर करत आहेत. तर काही साखर कारखानदार वर्ष उलटले तरी बिले देण्यास तयार नाहीत. ऊसदर जाहीर केला जातो. मात्र त्या दराप्रमाणे शेतकऱयांच्या खात्यामध्ये रक्कम जमा केली जात नाही. त्यामुळे आपल्यावर अन्याय होत आहे, तेव्हा तातडीने सरकारने यावर तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
चन्नम्मा चौकात पोलिसांबरोबर वाद
कित्तूर चन्नम्मा चौक येथे शेतकऱयांनी तब्बल दोन तास ठाण मांडले. यामुळे पोलीस अधिकाऱयांनी तुम्हाला अटक करणार, असे सांगितले. त्यावर शेतकरी आणि पोलिसांमध्ये चांगलीच वादावादी झाली. अटक आवश्यक करा, मात्र पुढील कायदा व सुव्यवस्थेला तुम्हीच जबाबदार असाल, असा इशारा दिला.