वृत्तसंस्था/ गांधीनगर
2022 पर्यंत शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्दीष्टाकडे सरकार वेगाने वाटचाल करत आहे. शेतकऱयांचे प्रयत्न आणि सरकारचे पुरक धोरण यामुळे हे शक्य होत असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. येथे आयोजित जागतिक बटाटा संशोधन व उत्पादन परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
या परिषदेचे मोदी यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन केले. या परिषदेसाठी आलेल्या जगभरातील शास्त्रज्ञांचे त्यांनी स्वागत केले. तसेच पुढील तीन दिवसांमध्ये शेतकऱयांसाठी उपयुक्त आणि हितकारक अशा माहितीचे आदानप्रदान होईल, असा विश्वास व्यक्त केला. अन्नधान्य उत्पादनामध्ये भारत जगात पहिल्या तीन देशांमध्ये आहे. शेतीमध्ये उत्पन्न घेण्यासाठी कमीत कमी खर्च कसा होईल, यावर सरकार प्रयत्न करत आहे. त्याचा लाभ होऊन शेतकऱयांना अधिक उत्पन्न मिळणार आहे. शेतकऱयांच्या हितासाठी ‘किसान सन्मान निधी’ योजना सुरु केली आहे. गेल्या महिन्यात एकाचवेळी 6 कोटी शेतकऱयांच्या बँक खात्यांमध्ये 12 हजार कोटी रुपये हस्तांतरीत केल्याचीही त्य़ांनी आठवण करुन दिली.