‘मन की बात’ : केंद्रीय कृषी कायद्यांचे फायदे केले अधोरेखित
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्राच्या कृषीविषयक कायद्याला विरोधी पक्षांनी काळा कायदा म्हणत विरोध दर्शवला आहे. पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱयांकडून कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीत आंदोलन सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’द्वारे केंद्रीय कृषी कायद्याबाबत शेतकऱयांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला आहे. काही शेतकऱयांची उदाहरणे देत पंतप्रधानांनी केंद्रीय कृषी कायद्याचे फायदे सांगितले आहेत.
देशात शेती आणि शेतीशी संबंधित गोष्टीसोबत नवे आयाम जोडले गेले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या कृषी कायद्यांमधील सुधारणांमुळे शेतकऱयांसाठी नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. बराच विचार केल्यानंतर भारताच्या संसदेने कृषी सुधारणांना कायद्याचे स्वरुप दिले. या सुधारणांमुळे केवळ शेतकऱयांची बंधनेच नष्ट झालेली नाहीत, तर त्यांना नवे अधिकारही मिळाले असून नव्या संधी देखील उपलब्ध झाल्याचे पंतप्रधानांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात सांगितले.
शेतकऱयाला कायद्याचा आधार
नव्या कृषी कायद्यात उपविभागीय दंडाधिकाऱयाला शेतकऱयाच्या तक्रारीचे समाधान एका महिन्याच्या आत करण्याची तरतूद आहे. नव्या कायद्यांतर्गत पीक खरेदीनंतर शेतकऱयाला तीन दिवसांत पूर्ण पैसे द्यावे लागतात. जर तसे केले नाही तर तक्रार दाखल करता येते. त्यानुसार आमच्या शेतकरी बंधूची समस्या दूर होते. याचे कारण म्हणजे आमच्याकडे तसा मजबूत कायदा आहे, असे मोदींनी सांगितले.
महाराष्ट्रातील शेतकऱयाचा उल्लेख
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील धुळे येथील जितेंद्र भोईजी या शेतकऱयाचे उदाहरण देशवासियांना दिले. भोईजी यांनी कृषी कायद्याचा कसा फायदा घेतला हे पंतप्रधानांनी जनतेशी संवाद साधताना सांगितले. त्याने मक्मयाची शेती केली होती. व्यापाऱयांनी त्याच्या मालाची किंमत 3 लाख 32 हजार निश्चित केली होती. त्याला 25 हजार रुपयांचा अ?Ÿडव्हान्सही मिळाला. परंतु उर्वरित पैसे चार महिन्यांपर्यंत दिले गेले नाहीत. त्यानंतर जितेंद्रने नव्या कायद्याच्या मदतीने सर्व पैसे मिळवले, असा उल्लेखही मोदींनी केला आहे.
राजस्थानच्या शेतकऱयाचे कौतुक
पंतप्रधानांनी राजस्थानच्या मोहम्मद अस्लम या शेतकऱयाचाही प्रामुख्याने उल्लेख केला. मोहम्मद अस्लम हे शेतकऱयांना जागरुक करण्याचे काम करत असून ते एका शेतकरी उत्पादक संघटनेचे सीईओ देखील आहेत. आता देशाच्या एका कोपऱयात काम करणाऱया शेतकऱयांच्या संघटनेमध्येही सीईओ होऊ लागले आहेत हे ऐकून मोठमोठय़ा कंपन्यांच्या सीईओंनाही आनंद होईल, असे मोदी म्हणाले.