बेळगाव / प्रतिनिधी
शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी बंदमुळे परिवहन मंडळाच्या बस सेवेवर मोठा परिणाम झाला असून एका दिवसाचे उत्पन्न पूर्णपणे घसरले होते. आधीच कोरोनामुळे परिहवनचे प्रंचड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच मंगळवारी पुरकारलेल्या देशव्यापी बंदमुळे परिवहनला मोठा फटका बसला.
बसस्थानकातून सकाळच्या सत्रात 10 वाजेपर्यंत एकही बस बाहेर पडली नाही. त्यानंतर बससेवा सुरळीत सुरू झाली. लांब पल्ल्यासाठी व स्थानिक बसेस सुरू झाल्या मात्र प्रवाशांअभावी काहीशा बसेस धावल्या मात्र त्यांनाही प्रवाशांचा प्रतिसाद अल्पच होता. त्यामुळे परिवहनच्या उत्पन्नावर परिणाम झाला. कोल्हापूर, मुंबई, पुणे, बेंगळूर, म्हैसूर, हुबळी, यासह स्थानिक बससेवेववर परिणाम झाल्याची माहिती परिवहन दिली आहे.
शेतकरी संघटनांनी बसस्थानकाच्या प्रवेशव्दारावर निदर्शने करत चहा तयार करून केंद्र सरकारचा निषेध नोंदविला. त्यामुळे सकाळी 10 वाजेपर्यंत एकही बस बाहेर पडू शकली नाही. त्य़ामुळे सकाळच्या सत्रात लांब पल्ल्यासाठी धावणाऱया बसेस जाग्यावर थांबून होत्या. काहीसे तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने परिवहनने काही फेऱया रद्द केल्या. तर बंदमुळे प्रवाशांनीही प्रवास करणे टाळल्याने फेऱया रद्द झाल्या होत्या. परिणामी परिवहनला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले.