संबंधितांवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱयांना दिले शेतकऱयांनी निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
कृषीप्रधान म्हणून ओळखलेल्या भारत देशामध्ये शेतकऱयांना भाजप सरकार चिरडून मारत आहे. हे देशाचे दुर्दैव आहे. शेतकऱयांनी जाचक जे तीन कायदे केले आहेत ते रद्द करण्याची मागणी केली आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन केले आहे. मात्र अशाप्रकारे शेतकऱयांच्या अंगावर वाहने चालवून शेतकऱयांना देशोधडीला लावणाऱया या भाजप सरकारचा रयत संघटनेच्यावतीने तीव्र निषेध नोंदविण्यात आला.
जिल्हाधिकाऱयांना निवेदन देऊन त्या घटनेमध्ये समाविष्ट असलेल्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश येथे शेतकरी आंदोलन करीत असताना मंत्र्यांच्या वाहनांनी शेतकऱयांना चिरडले. यामध्ये चार शेतकऱयांचा मृत्यू झाला आहे. देशातील ही पहिलीच घटना आहे. भाजपने संपूर्ण देशाची वाट लावली आहे, असा आरोप यावेळी शेतकऱयांनी केला आहे.
शेतकऱयांविरोधात जे तीन कायदे केंद्र सरकारने अंमलात आणले आहेत ते रद्द करावेत, अशी मागणी संपूर्ण देशभरांतून होत आहे. असे असताना केंद्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. लोकशाही मार्गाने लढा देत असताना तो चिरडला जात आहे. त्यामध्ये शेतकऱयांचा एकप्रकारे खून होत असल्याचा आरोपही या निवेदनात करण्यात आला.
महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कर्नाटक राज्य रयत संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब देसाई, सुभाष धायगोंडे, मारुती कडेमनी, चंद्रू राजाई, नामदेव धुडूम, बसवराज कुराडे, निंगाप्पा मायण्णा, राजू कागणीकर, नागेश देसाई, भैरू डंगरले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.