अखिल भारतीय किसान महासभेतर्फे निवेदन. 2014 ते 2019 पर्यंतची नुकसानभरपाई येणे बाकी.
डिचोली/प्रतिनिधी
मये गावातील शेतकऱयांचे या भागातील खाण कंपनीच्या मातीमुळे झालेली नुकसानभरपाई अद्याप चौगुले व सेसा खाण कंपनीकडून देण्यात आली नसून ती शेतकऱयांना येईपर्यंत चौगुले खाण कंपनीचा ई लिलावाच्या खनिज मालाची वाहतूक करू नये. अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेतर्फे करण्यात आली आहे. या संदर्भात एक निवेदन या महासभेच्या मये विभागातर्फे डिचोली उपजिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्यात आले आहे.
मये गावतील शेतजमिनींची या भागात कार्यान्वति असलेल्या खाण कंपन्यांमुळे वाताहत झाली असून त्या संदर्भात विभागीय कृषी अधिकाऱयांतर्फे करण्यात आलेल्या सर्व्ह?त शेत जमिनींचे आणि शेतकऱयांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार सर्व शेतकरी नुकसानभरपाईस पात्र ठरत असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र नुकसान भरपाई देण्याबाबत केवळ दिरंगाईच करण्यात आली आहे. या विरोधात मयेतील शेतकरी आता जागे झाले असून शेतकऱयांची नुकसानभरपाई मिळेपर्यंत लढा चालूच ठेवणार असल्याचे यावेळी अखिल भारतीय किसान महासभेचे अध्यक्ष कृष्णा गडेकर यांनी सांगितले.
यावेळी अँड. यतीन नाईक, अँड. विक्टर सावियो ब्रागांझा, किसान महासभेचे खजिनदार स्वयम कामत, समन्वयक सदानंद शेट, राजन नाईक, रामू घाडी, मनोहर नाईक, द्रौपती कारबोटकर व इतरांची उपस्थिती होती.
मयेतील शेतकऱयांची नुकसानभरपाई खाण कंपन्यांकडून येणे बाकी असतानाही जखमींना वर मीट चोळण्याचा प्रयत्न सदर खाण कंपन्या करीत आहे. शेतकऱयांना वाऱयावर सोडून खाण मालाची वाहतूक करण्याचा घाट या कंपनीने ई लिलावाच्या नावाखाली रचला होता. त्यास विरोध करताना शिरगावातील स्थानिकांनी माल वाहतूक अडवली होती. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. परंतु सदर विषय गंभीर असून सरकार याकडे दुर्लक्ष करीत असल्याने शेतकऱयांनी आता कोणाकडे पहावे, असा सवाल यावेळी उपस्थित शेतकऱयांनी केला.
चौगुले खाण कंपनीवरील खनिज मालाची वाहतूक करण्यापूर्वी मये गावातील शेतकऱयांची 2014 ते 2019 या काळातील थकलेली नुकसान भरपाई त्वरीत द्यावी. या मागणीसाठी गेल्या 25 नोव्हे. 2021 रोजी डिचोली शहरात मयेतील शेतकऱयांनी भव्य मोर्चा काढला होता. या मोर्चातून शेतकऱयांना नुकसानभरपाई देण्यात यावी अशी जोरदार मागणी शेतकऱयांना केली होती. परंतु सरकारकडून या विषयी कोणतीच गंभीरता दाखविण्यात आलेली नाही. त्यासाठी यावेळी सरकारने या विषयी लक्ष घालताना सर्वप्रथम शेतकऱयांना नुकसानभरपाई मिळवून द्यावे. तोपर्यंत खनिज.वाहतूक करू देऊ नये. अशी मागणी यावेळी उपस्थित शेतकऱयां?नी केली.