डाळींब, द्राक्ष, बटाटा, टोमॅटो, कांदा उत्पादक शेतकऱयांनी विमा भरावा
प्रतिनिधी / बेळगाव
द्राक्ष, डाळींब, बटाटा, टोमॅटो, कांदा, हळद, कोबी उत्पादक शेतकऱयांनी तातडीने पिक विमा भरुन त्या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पंचायतीच्या फलोत्पादन उपनिर्देशकांनी केले आहे.
अथणी, रायबाग, चिकोडी, सौंदत्ती, बैलहोंगल या परिसरातील शेतकऱयांनी 2021 या खरीप हंगामामध्ये पीक विमा भरावा. यासाठी 30 जून ही शेवटची तारीख आहे. त्यापूर्वी डाळींब, द्राक्ष, हळद, कांदाया पिकांसाठी विमा भरावा, असे कळविण्यात आले आहे.
द्राक्षसाठी प्रतिहेक्टर 14 हजार 400, डाळींबसाठी प्रतिहेक्टर 6 हजार 350, हळदसाठी प्रतिहेक्टर 6 हजार 650 रुपये भरावेत, असे कळविण्यात आले आहे. तर बेळगाव तालुक्मयातील शेतकऱयांनी बटाटा, टोमॅटो, कांदा, कोबी या पिकांच्या विम्यासाठी शेवटची तारीख 31 जुलै 2021 असून त्यापूर्वीच शेतकऱयांनी परिसरात राष्ट्रीयकृत बँक किंवा कृषी केंद्रामध्ये हा विमा भरावा, असे कळविण्यात आले आहे.
पावसाळी बटाटय़ांसाठी 3 हजार 500 प्रतिहेक्टर, टोमॅटोसाठी प्रतिहेक्टर 5 हजार 900, कांदा पिकासाठी प्रतिहेक्टर 3 हजार 750 तर पावसाळी कांदापिकासाठी 3 हजार 500, कोबीसाठी प्रतिहेक्टर 3 हजार 150 रुपये भरावेत आणि याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.