कोल्हापूर/ प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून साखर कारखान्यांकडून शेती पंपाच्या थकीत वीज बिलांची तसेच पाटबंधाऱ्याच्या थकीत पाणी पट्टीची वसुली सुरू केली आहे. याची सुरूवात जवाहर साखर कारखान्याकडून सुरू झाली आहे. हा प्रकार अतिशय गंभीर आहे. शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून वीज बील वसुली सुरू झाल्याने शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडणार नाही. याला तीव्र विरोध करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मा. सावकर मादनाईक यांच्या यांच्या नेतृत्वाखाली आज दु. ३ वाजता जवाहर साखर कारखान्यावर आंदोलन करण्यात येणार आहे. सर्व ऊस उत्पादक शेतकर्यांनी हुपरी येथील जवाहर कारखान्यावर मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, ही विनंती.