कसबा बीड / प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या हक्काच्या न्याय मागण्यासाठी गावभुमी कसबा-बीड पासुन ते जिल्हाधिकारी कचेरीपर्यंत पायी दिंडी काढण्यात आली. ऐन दिवाळीसणात आंदोलन छेडत शेतकर्यांनी या अनोख्या आंदोलनास प्रारंभ करुन गाव ते जिल्हाधिकारी कचेरी पर्यंतचा शेतकऱ्यांच्या लढ्याचा प्रवास सुरु केला.
शेतकऱ्यांचा शेतीचा सातबारा कोरा करा, शेतीची सर्व कर्ज माफ करा, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करा, शैक्षणिक कर्ज माफ करा, पुरग्रस्त शेतक-यांना नुकसान भरपाई द्या, शेतीसाठी २४ तास वीज पुरवठा करा,पेट्रोल ,डिझेल, खते यांचे दर कमी करा, आदि मागण्या करीत आंदोलकांनी सकाळी आठ वाजता दिंडीस प्रारंभ झाला. महे, कोगे, पाडळी, बालिंगा, फुलेवाडी, रंकाळा अंबाबाई मंदीर, शिवाजी पुतळा, दसरा चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन देण्यात आले.
या आंदोलनात शेतकरी नेते मुकुंद पाटील, अँड.प्रकाश देसाई, अँड. किरण पाटील, महेचे सरपंच सज्जन पाटील. एस आर पाटील, एसडी जरग.कसबा-बीडचे माजी सरपंच सत्यजीत पाटील, जर्नादन दळवी आदिंची भाषणे झाली.गोकुळचे चेअरमन विश्वासराव पाटील, कुंभी कासारी संचालक दादासो लाड व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश तिबिले सचिन पाटील, कोगे गावचे सरपंच नीलम पाटील, उत्तमराव वरुटे, पाटील, कोगेचे बळीराम चव्हाण, रंगराव पाटील, रघुनाथ पाटील, कोजीमाशीचे उपाध्यक्ष शिवाजी लोंढे यांच्यासह भागातील शेतकरी उपस्थितीत यावेळी होते.