शाहुवाडी / प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी जनसुराज्य शक्ती पक्ष कानसा वारणा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन यांच्यावतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शाहुवाडी तहसील कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनाचे नेतृत्व कृष्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
या विविध संघटनेच्यावतीने शेतकरी विरोधी कायदा रद्द करा, लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करा, धरणग्रस्तांच्या न्याय्य हक्कासाठी वीज कनेक्शन त्याचबरोबर शेती पंप वीज कनेक्शन त्वरित द्यावी, शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करावा, ग्रामपंचायतीच्या थकीत विज बिलावरील व्याज माफ करावे, विरळे पळसवडे येथील वीज संदर्भातील प्रलंबित कामे पूर्ण करावीत या मागण्यांची त्वरित दखल घेऊन येथील नागरिकांना न्याय मिळावा, अशी मागणी या संघटनेच्यावतीने करण्यात आली असून संबंधित विभागात तहसीलदार व वीज वितरण अधिकारी यांनी तातडीने या कामी लक्ष घालून नागरीकांची प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावावी अशी मागणी कृष्णा पाटील यांनी यावेळी केली.
या धरणे आंदोलनात कृष्णा पाटील, वसंत पाटील, भैय्या थोरात, दादा पाटील, सुरेश माऊटकर, जयसिंग पाटील ,लक्ष्मण पाटील, सुरेश पाटील ,रामचंद्र पाटील, अनिल पाटील, हरीबा घोलप , जिजाबाई घोलप , सुसाबाई घोलप , मनोज पाटील राजू रेठरेकर , विजय तिडके आदींच्या सह ग्रामस्थ सहभागी झाले होते.