प्रतिनिधी / वैराग
२३ डिसेंबर, शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयात तर पिकवीम्यासाठी ॲक्सा विमा कंपनीचे कार्यालयांमध्ये रात्री ९ वाजेपर्यंत शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले त्यावेळी आकाश उंबरे, दत्तात्र्य पाटील, कृष्णा घावटे, बाळू उंबरे, भोलेनाथ उंबरे, भालचंद्र आगलावे, शरद भालेकर, सचिन आगलावे, समाधान भालेकर, भगवान निर्मळ, नामदेव आगलावे, अर्जून उंबरे, मोहन ननवरे, हनुमंत फोपले, अनुरथ आगलावे, सचिन पाटील, नागनाथ पवार, बाळू पवार, कुमार फोपले, अशोक आगलावे, बाबासाहेब आगलावे, पप्पू शेख, विनोद उंबरे आदींसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
चालू वर्षीची अतिवृष्टीची व सर्वच पिकांना शंभर टक्के पिकवीमा भरपाई द्या, सन २०१८-१९चा मागील राहिलेला दुष्काळ निधी द्या, सर्वच खातेदारांना प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेचा लाभ द्या आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
३० डिसेंबरच्या आत मागण्यांची पुर्तता न झाल्यास ३० डिसेंबर पासून पुणे येथील राज्याच्या कृषी आयुक्ताला व पिकविमा कंपनींच्या राज्याच्या प्रमुख कार्यालयांमध्ये बेमुदत घेराव आंदोलन करणार असल्याचा इशाराही यावेळी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिला.