सोलापूर/ प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यात झालेल्या वादळी, अतिवृष्टी व नदीच्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व त्यांना जाग करण्यासाठी आज गुरुवारी रयत क्रांती संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले.
रयत क्रांती संघटनेचा नारा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा, जिरायत भागातील शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 50 हजार रुपये, बागायती फळबागांना प्रतिहेक्टर एक लाख रुपये नुकसानभरपाई द्या, शेतकऱ्यांचे शेतीपंपांची वीज बिल माफ करावे व नदीकाठी पुरामुळे ज्या शेतकऱ्यांची जमीन वाहून गेल्या त्यांना एकरी 50 हजार रुपये मिळाले अशा मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना रयत क्रांती संघटनेच्यावतीने देण्यात आले.
यावेळी रयत क्रांती संघटनेचे दीपक भोसले, राहुल बिडवे, रणजीत पाटील, रणजीत चव्हाण, राजकुमार ठोकळे , नंदू व्यवहारे, सुनील पाटील, सोमनाथ पाटील, सोमनाथ भोसले, दत्तात्रय गायकवाड, बळीराम गायकवाड, अमोल गवळी, अण्णासाहेब जाधव यांच्यासह रयत क्रांतीचे पदाधिकारी उपस्थित होते.