ऑनलाईन टीम
मान्सूनचे वेध लागले असतानाच शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारने खतांची दरवाढ मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. खतांवरील सबसिडीमध्ये केंद्राने 140 टक्क्यांची वाढ केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज उच्च स्तरीय बैठक झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
शेतकऱ्यांना आता खताच्या पिशवीवर 500 ऐवजी 1200 रुपये सबसिडी मिळणार आहे. त्यामुळे 2400 रुपयांची खताची पिशवी सेतकऱ्यांना 1200 रुपयांना मिळणार आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांत खतांच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होता. तसेच काँग्रेससह विरोधी पक्षांनीही केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. खतांच्या किमतीत 700 रुपयांपर्यंत वाढ करून शेतकऱ्यांना गुलाम बनवण्याचे केंद्राचे धोरण असल्याचे विरोधकांनी आरोप केले होते. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही खतांची दरवाढ मागे न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता.