अक्कलकोट / प्रतिनिधी
किणी येथे महावितरणच्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत सुमारे ६ लाख रुपये किमंतीचे सहा एकर ऊस जळून खाक झाला आहे. ही घटना मंगळवारी ( दि. ४ ) सकाळी ११ वाजता घडली. या घटनेमुळे परिसरातून महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आला असून त्वरित भरपाई मिळावी, अशी मागणी शेतक-यांनी तहसिलदार, उपअभियंता विद्युत वितरण विभाग व पोलीस निरीक्षक यांच्याकडे एका लेखी निवेदनाव्दारे केली आहे. किणी येथील प्रयागबाई शिवप्पा साखरे यांचे गट नं.२७७/१ व गट नं.२७७/२/ब/१ व २७७/२/ब/२ या मिळकतीमधील ४ एकर उसाचे क्षेत्र याठिकाणी आहे. सध्या ऊस गाळपास आले होते.
या शिवारातील बिराजदार डी.पी. (ट्रॉन्सफर्मर) वरुन एम.एस.ई.बी. चे सबलाईन गेली आहे. सदर पोलवरील तारा ढिले असल्याने व ते वाऱ्याने झुलत असल्याने अनेक वेळा एम.एस.ई.बी. च्या कर्मचाऱ्यांना माहिती देवून देखील कर्मचाऱ्यांनी वेळीच दखल न घेतल्याने व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे पोलवरील तारा एकमेकास घासल्याने स्पार्क होवून ठिणगी ऊसाच्या फडात पडल्याने या शेतातील एकूण ४ एकर ऊस जळून खाक झाली आहे.
तसेच शेजारील शेतकरी दिलीप रेवणसिध्द बिराजदार (गट नं.३०४/२), दत्तात्रय नागनाथ बिराजदार (गट नं.३०४/१) यांच्या दोन एकर शेतजमीनतील ऊसाचे पिक देखील जळून खाक झाली आहे. या सर्व खातेदारांच्या ऊस क्षेत्राच्या ठिकाणावरुन महावितरणची विद्युत वाहिनी गेलेली आहे. विद्युतवाहिन्या लोंबकळलेल्या स्थितीत आहेत. तसेच ढिल्या पडलेल्या अवस्थेत आहेत. लोंबकळणाऱ्या विद्युत वाहिन्या एकमेकाला चिकटत होत्या. त्यामुळे अनेक वेळा या ठिकाणी शॉर्टसर्किट होऊन पार्किंग होत असलेले येथील शेतकऱ्यांच्या लक्षात आलेले होते. पार्किंगमुळे येथे विघातक गोष्ट घडू नये, म्हणून खबरदारी वजा या सर्व शेतकऱ्यांनी महावितरणकडे तक्रार दाखल केलेली होती. तक्रारीतून लोंबकळणाऱ्या विद्युत वाहिन्या व्यवस्थित करून घेण्याची मागणीही करण्यात आलेली होती.
अनेक वेळा तक्रार करूनही महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या कडून या मागणीकडे कानाडोळा केला होता. मंगळवारी सकाळी अचानक लोंबकळणाऱ्या तारांचा एकमेकांना स्पर्श झाल्याने स्पार्किंग होऊन ठिणग्या ऊस क्षेत्रात पडल्या. भर उन्हात घडलेल्या या प्रकारामुळे लगेच ऊसाने पेट घेतला. उसाचे सर्व क्षेत्र एकमेकाला लागून असल्याने एक सलग चार एकर क्षेत्रातील ऊस काही वेळातच जळून खाक झाला. यामुळे पाच शेतकऱ्यांचे जवळपाससहा लाख रुपये नुकसान झाले असल्याचे संबंधित शेतकऱ्यांनी सांगितले. या जळीत झालेल्या ऊस पिकाचा महसूल यंत्रणेने पंचनामा केला. सदर आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झाली