प्रतिनिधी / सरवडे
कोरोनाच्या विषाणू साथीने अनेक शेतमजूर भूमिहीन लोक अडचणीत आले आहेत. त्यांना केंद्र व राज्य शासनाने भरीव अनुदान द्यावे यासह विविध मागणींसाठी आरपीआयथ (गवई ), जनता दल व विविध संघटनेच्या वतीने तहसीलदार मीना निंबाळकर यांना भिमराव कांबळे यांनी निवेदन सादर केले.
निवेदनाचा आशय असा की कोरोना विषाणूच्या साथीने सारा देशचं कडीकुलापत बंद झालेला आहे. सरकारनेच 40 दिवसाची संचार बंदी लागू केली आहे परंतू यामुळे रोजच्या कमाईवर उदरनिर्वाह करणाऱ्या वर्गावर उपासमारीची वेळ येणार आहे बांधकाममजूर ,भूमिहीन शेतमजूर ,टॅक्सी रिक्षा चालवणारे, ऊसतोड मजूर ,सर्वसामान्य शेतकरी ,हॉटेल कामगार ,सुशिक्षित बेकारीयुवक ,चर्मकार, कुंभार, फोटोग्राफी, पानपट्टी, सलून दुकान, सुतार, मागासवर्गीय भूमिहीन लोक, कुटीर छोटे उद्योग करणारे लोक अश्या अनेक गरिबांची लॉकडाऊन मध्ये अवस्था अत्यंत बिकट होणार आहे तरी केंद्र व राज्य शासनाकडून 15 हजार रुपये अनुदान मिळावे, रोजगार बुडाल्याने शेतमजुरांचा प्रश्न गंभीर असून शासनाने रोजगार करणाऱ्यांचा सर्व्ह करून सरकारने तातडीने गरिबांना रोजगार व रोख स्वरूपात मदत करावी.
शासनाने हरभरा डाळ, तूरडाळ, साखर, तेल या जीवनावश्यक वस्तू शासकीय धान्य दुकानातून रास्त भावात मिळावे. काही कुटुंबातील सदस्यांचे रेशन कार्डला आधार लिंकिंग नाही व रेशन कार्ड नसणाऱ्यानाही धान्य मिळावे ,काळा बाजार करणाऱ्यावर कठोर कारवाई करा. कोरोणाच्या संकट काळात कर्तव्य बजावणाऱ्या पत्रकार, ग्रामसमीती सदस्यांचा विमा उतरावावा, या व अन्य विषयांवर चर्चा करण्यात आली .यावेळी आरपीआय चे जिल्हा उपाध्यक्ष भिमराव कांबळे, जनता दलाचे युवा अध्यक्ष शरद पाडळकर ,वंचित आघाडीचे यशवंत कांबळे, एम आर कांबळे, एकतावादी रिपब्लीकन अध्यक्ष बाळासो बेलेकर, तालुका अध्यक्ष प्रकाश शिरशेकर, बी के कांबळे, साताप्पा कांबळे, सागर कांबळे एकबाल कलोट प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.