शौचालयाअभावी उघडय़ावर विधी करण्याची वेळ
वाळपई / प्रतिनिधी
नगरगाव पंचायत क्षेत्रातील शेळपी या ठिकाणी 2017 साली पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली होती. पिण्याच्या पाण्यामध्ये ई काँलाय हे जंतू सापडल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम खात्याने चांगल्या प्रकारे कार्य केले होते. मात्र पुन्हा एकदा याच गावात गढूळ पाण्याची समस्या निर्माण झाली असून पुन्हा एकदा नागरिक नदीच्या पाण्यावर आपली सोय करीत असून याठिकाणी शौचालयाची व्यवस्था न झाल्यामुळे उघडय़ावरच नैसर्गिक विधी करीत आहेत. यामुळे पुन्हा एकदा या भागातील जनतेच्या आरोग्यावर समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त झालेली आहे.
गढूळ पाण्याची समस्या अनेक महिन्यापासून.
2017 साली गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाल्यानंतर नागरिकांनी नजीक ठिकाणी असलेल्या नदीवर आपली सोय भागविली होती. त्याचप्रमाणे गावामध्ये शौचालयाची व्यवस्था नसल्याने अनेक नागरिक आपला नैसर्गिक विधी करण्यासाठी या नदीवर जात होते .यामुळे अचानकपणे या गावातील नागरिकांना ताप व जुलाब होऊ लागल्यामुळे सदर पाण्याची तपासणी करण्यात आली .यावेळी या पाण्यामध्ये ई काँलाय हे जंतू असल्याचे निष्पन्न झाले होते .अशा प्रकारचे पाणी सदर ग्रामस्थ पिण्यासाठी वापरत होते. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर स्वरुपाची समस्या निर्माण झाली होती. यामुळे आरोग्य खात्याची यंत्रणा खडबडून जागी झाली. स्थानिक आमदार तथा आरोग्यमंत्री विश्?वजित राणे यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाणी पुरवठा खाते आरोग्य खाते स्थानिक सरपंच पंच सभासद यांची संयुक्त बैठक घेऊन यासंदर्भात उपाययोजना काढण्यावर भर दिली होती. त्यानंतर सदर गावांमध्ये असलेल्या कुपनालीकेवर शुद्धीकरण यंत्रणा बसविल्यानंतर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात आला होता.
सुरुवातीला गढूळ पाणी.
गेल्या जवळपास दोन महिन्यापासून गावातील नागरिकांच्या नळांना एक तासभर पूर्णपणे गढूळ स्वरूपाचे पाणी येत आहे. या संदर्भातील तक्रारी वाळपई पाणीपुरवठा खात्याकडे करण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे याठिकाणी काम करणाऱया ऑपरेटरला यासंदर्भात गांभीर्याने लक्ष देण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र त्याकडे अजिबात लक्ष देण्यात आले नाही. सध्यातरी या गढूळ पाण्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर स्वरूपाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही. अशा प्रकारचे पाणी पिऊन पुन्हा एकदा आम्ही आमच्या आरोग्य बिघडवावे का अशा प्रकारचा सवाल सदर भागातील महिला भगिनींनी केला आहे.
बिलाचा मीटर धावतो मात्र पाणी गढूळ.
या भागातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हा सदर भागातील शुद्धीकरण प्रकल्प सुरू करण्यात येत असतो. त्यावेळी पहिल्यांदा जवळपास एक तास पूर्णपणे गढूळ पाणी नळाला येत असते. सदर पाणी वापरण्याजोगे नाही. मात्र मिटर शीघ्र गतीने धावत असतो .यामुळे बिलाचा भुदर्ड नागरिकांना सहन करावा लागत आहे. यासंदर्भाच्या तक्रारी करून कोणत्याही प्रकारचे लक्ष देण्यात आले नसल्याचे नागरिकांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी आता मोठय़ा प्रमाणात महिला व नागरिक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नजीक ठिकाणी असलेल्या नदीच्या पाण्यावर करीत असल्याचे यावेळी नागरिकांनी स्पष्ट केले.
शौचालय व्यवस्था नाही पुन्हा उघडय़ावर नैसर्गिक विधी.
2017 साली नागरिक उघडय़ावर नैसर्गिक विधी करीत असल्यामुळे ई काँलाय जंतूच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर स्वरूपाचे परिणाम झाले होते. दोन वर्ष उलटली तरीसुद्धा अजून पर्यंत 50 टक्के घरे शौचालयाच्याविना आहेत. यामुळे या भागातील नागरिकांना उघडय़ावर नैसर्गिक विधी करण्याशिवाय अन्य प्रकारची सोय नाही. यामुळे या भागांमध्ये पुन्हा एकदा ई कोलाई जंतूप्रमाणे गंभीर स्वरूपाची परिस्थिती निर्माण झाल्यास त्याला जबाबदार कोण अशाप्रकारचा सवाल या भागातील नागरिकांनी केला आहे.
तुर्तास टँकरने पाणी पुरवठा करणार.
दरम्यान यासंदर्भात वाळपईच्या पाणीपुरवठा कार्यालयाशी संपर्क साधला असता सहाय्यक अभियंता सोमा नाईक यांनी सांगितले की या संदर्भाची तक्रार आपल्याकडे आलेली आहे. यामुळे टॅ?करच्या माध्यमातून सध्यातरी या गावांना पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करण्यात येतील. गढूळ पाण्याची समस्या सोडविण्यासाठी सदर ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करून नंतर त्यासंदर्भात उपायोजना करण्यावर भर देणार असल्याचे सहाय्यक अभियंता श्री नाईक यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले.