शेकडो झांडाना राख्या बांधून साजरा केला वृक्ष बंधनाचा सण.दाखल करण्यात आलेले गुन्हे त्वरित मागे घ्या— मागणी
प्रतिनिधी /वाळपई
शेळ मेळावली भागातील जंगल संपत्ती हा आमचा महत्त्वाचा वारसा आहे. यामुळे या भागातील जंगलातील झाडे कापणे आमची सक्त मनाई आहे. यामुळेच जागतिक स्तरावरील नामांकित असलेल्या आयआयटी प्रकल्प या ठिकाणी होऊ देणार नसल्याचा पवित्र या भागातील भूमिपुत्रांनी घेतला होता .शेळ मेळावली या ठिकाणी आयआयटी प्रकल्पाच्या विरोधात उभारण्यात आलेल्या आंदोलनाला सत्तरी तालुक्मयातील वेगवेगळय़ा घटकांनी चांगल्या प्रकारचे सहकार्य केले. यामुळे आज मेळावली भागातील जंगलसंपत्ती वाचलेली आहे. येणाऱया काळातही या जंगल संपत्तीवर कोणीही वक्रदृष्टी ठेवणार नाही याची विशेष दखल घेऊन मेळावली भागातील नागरिकांनी रविवारी मोठय़ा प्रमाणात जल्मी देवस्थानच्या प्रांगणामध्ये जमुन वृक्ष बंधन केले. या आगळय़ा वेगळय़ा स्वरूपाच्या कार्यक्रमात मोठय़ा प्रमाणात नागरिक व महिला भगिनी भाग घेतला होता.
याबाबतची माहिती अशी की जागतिक स्तरावर घातलेल्या आयआयटी प्रकल्पविरोधी आंदोलनामुळे शेळ मेळावली भाग हा पूर्णपणे जागतिक स्तरावर प्रकाशझोतात आला .सुमारे तीन हजार कोटी खर्चून हा प्रकल्प याठिकाणी उभारण्यात येणार होता .मात्र या भागात सदर प्रकल्प उभारण्यात भूमिपुत्रांच्या जमिनीवर गंडांतर येण्याची भीती होती .त्याचप्रमाणे या भागातील मोठय़ा प्रमाणात वृक्ष संपत्तीची हानी होण्याची भीती होती. यामुळे या प्रकल्पाला सुरुवातीपासूनच विरोध करण्यात आला होता. मात्र सरकारने ताणून धरल्यामुळे नागरिकांनी आपले आंदोलन तीव्र केले व शेवटी सरकारला गुडघे टेकावे लागले व हा प्रकल्प या भागातून स्थलांतरित करण्याची पाळी आली.
या भागातील जंगल संपत्तीमुळे आज वारसा स्थळांचे संवर्धन झालेले आहे. आमच्या पिढय़ांनी त्याचे रक्षण केले आहे .विकासाच्या नावाखाली या भागातील जंगल संपत्ती नष्ट झाल्यास येणाऱया काळात पर्यावरणाला मोठय़ा प्रमाणात घातक स्वरूपाचे परिणाम भोगावे लागणार आहेत .यामुळे या भागातील जंगल संपत्तीवर कोणीही वाकडी नजर ठेवू नये यासाठी मेळावली भागातील नागरिक व महिला भगिनी रविवारी रक्षाबंधनाचा कार्यक्रम अनोख्या पद्धतीने साजरा केला.यावेळी मोठय़ा प्रमाणात नागरिक व महिला भगिनी उपस्थित होत्या .खास करून प्रत्येक झाडाला राखी बांधून त्यांचे रक्षण करण्याची शपथ घेतली . यावेळी बोलताना आयआयटी विरोधी आंदोलनाचे प्रमुख कार्यकर्ते शंकर नाईक यांनी सांगितले की सरकारने या भागातून आयआयटी प्रकल्पाची हकालपट्टी केलेली आहे. यामुळे आंदोलनाच्या वेळी अनेक जणावर दाखल करण्यात आलेले गुन्हे आता सरकारने मागे घेणे अत्यंत गरजेचे आहे. जर आयआयटी प्रकल्पच नाही तर गुन्हे कशाला अशाप्रकारचा सवाल व्यक्त करून हे गुन्हे त्वरित मागे घ्या व या भागातील सुशिक्षित तरुण तरुणींचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी सहकार्य करावे अशा प्रकारची हाक यावेळी त्यांनी दिली.या आंदोलनाचे निमंत्रक शशिकांत सावर्डेकर यांनी यावेळी बोलताना शेळ मेळावली भागातील नागरिकांची एकजूट आजही कायम आहे .यदाकदाचित आंदोलनाच्या माध्यमातून जर कोणी सूड घेण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याला एकजुटीने सामना करण्याचे गरज यावेळी त्यांनी व्यक्त केली .या भागातील जन्मी देवस्थान व परिसरामध्ये असलेली शेखडो वर्षांची परंपरा सांगणारी जंगली झाडे ही खरोखरच पर्यावरणाचे रक्षण करण्यात महत्त्वाचा घटक ठरत आहे .यामुळे या भागातील वृक्षांची हानी होणार नाही याची विशेष दखल या भागातील नागरीक घेणार आहेत .मात्र सरकारने आपला शब्द पाळावा व दाखल करण्यात आलेले गुन्हे त्वरित मागे घ्यावे .त्याचप्रमाणे या भागातील जमिनी भूमिपुत्रांच्या नावावर करून द्याव्यात अशा प्रकारची मागणी यावेळी करण्यात आली. स्थानिक पंचायत सभासद अर्जुन मेळेकर यांनी याप्रसंगी मार्गदर्शन केले.