दर्शनासाठी मंदीर बंदच : उपवासाची पदार्थाची मागणी वाढली
प्रतिनिधी/ सातारा
व्रतवैकल्यांच्या श्रावण महिन्यात दर वर्षी मंदिरामध्ये मोठी गर्दी उसळते. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मंदिरे खुली करण्यास नकार दिल्याने श्रावणी सोमवारीही देऊळ बंदच होती. आजवर दिर्घकाळ मंदिरे बंद ठेवण्याचा प्रसंग आला नव्हता. दरम्यान, शेवटच्या सोमवार असल्याने घराघरात पुजा करण्यात आली. काही महिलांनी निरंकार उपवास केला होता. उपवासात फराळी चिवडा, वेफर्स, राजिगिरा लाडु या पदार्थांची मागणी वाढली होती. या पदार्थासह केळी, सफरचंद या फळांना मागणी वाढल्याने फळ विक्रेत्यांना चांगला फायदा झाला. मंदिर बंद असताना काही भक्तांनी बाहेरून दर्शन घेतले.