साहित्य : 2 चमचे तूप, 10 ते 15 काजू तुकडे, 10 ते 12 बदाम काप, 10 ते 12 पिस्त्याचे काप, 10 ते 15 बेदाणे, 6 ते 7 खजूर सोलून, 1 वाटी शेवया तुकडे करून, अर्धी वाटी मावा, 1 लीटर दूध, 4 चमचे अथवा चवीनुसार साखर, 1 चमचा गुलाबजल, अर्धा चमचा वेलचीपूड
कृती : गरम तुपात काजू, बेदाणे आणि खजूरचे तुकडे परतवावेत. त्याच गरम तुपात शेवया टाकून दोन ते तीन मिनिटे हलक्या सोनेरी रंगावर परतवून घ्याव्यात. आता त्यात मावा टाकून दोन मिनिटे परतवावा. नंतर दूध ओतून एकसारखे ढवळत मिश्रण दाटसर बनवून घ्यावे. मिश्रण दाट झाले की 8 मिनिटे मंद आचेवरच ठेवावे. नंतर त्यात साखर मिक्स करावी. साखर विरघळली की त्यात काजू, बदाम, पिस्ता आणि बेदाणे मिक्स करावेत. नंतर गुलाबजल आणि वेलचीपूड मिक्स करावी. मिश्रण दोन मिनिटे मंद आचेवरच गरम करून आच बंद करावी. आता तयार खीर बाऊलमध्ये काढून खाण्यास द्या.