ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील मेलहूरा परिसरात आज पहाटे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आले.
शोपियान जिल्ह्यातील मेलहूरा परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मंगळवारी रात्री मिळाली. त्यानुसार शोधमोहीम हाती घेत जवानांनी मेलहूरा परिसराला घेराव घातला. दरम्यान, दहशतवाद्यांकडून झालेल्या गोळीबाराला सुरक्षा दलाच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. यामध्ये चार दहशवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले.
दहशतवाद्यांकडून अद्यापही गोळीबार सूरु असून,
गोळीबाराला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.