आज गीता जयंती असून त्यानिमित्त…. माधवराव आपल्या घरासमोरील बागेत आपल्या रोपटय़ांची पाहणी करत होते व माळीबुवांना सूचना देत होते. तोच सुमीत… सुमीत… असा मोठय़ाने आवाज आला व त्याबरोबरच सुमीत व मागे जवळजवळ ओरडतच सुप्रीता बाहेर आली. सुमीत माधवरावांकडे येऊन थांबला. तोच सुप्रीताची तक्रारवजा चिडचिड सुरू झाली. ‘बाबा, तुम्हीच समजवा याला, अजिबात देवाचं नामस्मरण नाही की एखादा श्लोक पाठ नाही. नुसता गडबडीत देवाला नमस्कार करतो व पळतो, जसं काय न आवडणारी डय़ुटी आहे. असेच जर चालत राहिले तर भावी पिढीमध्ये आपले संस्कार कुठून येणार, आपल्या संस्कृतीची ओळख कशी होणार?’ बघता बघता चिडचिडा स्वर, चिंतेने ग्रासलेला स्वर वाटू लागला. माधवरावांनी सुप्रीताला शांत हो, मी बोलतो, म्हणून आत पाठवले.
माधवराव विचार करू लागले, सुप्रीताचं म्हणणं अगदी बरोबर होतं. आताच्या पिढीत अध्यात्म, त्याचे ज्ञान याबाबतची वाढत चाललेली विरक्ती खरोखर चिंतेचा विषय आहे. आताची पिढी ही
प्रॅक्टिकल, ‘बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल म्हणणारी’, सांगीव गोष्टींवर विश्वास न ठेवणारी, प्रत्येक गोष्टीत वैज्ञानिक दृष्टिकोन परंतु आततायी व अधीर… परंतु यावर उपाय हा या पिढीशी बोलूनच सुटणार होता. म्हणून त्यांनी नातू सुमीत याच्याशी बोलायला सुरुवात केली.
माळीबुवांना आवश्यक सूचना दिल्या व सुमीतला घेऊन त्याच्या आवडत्या आईस्क्रीम पार्लरमध्ये गेले. खरेतर आजोबा-नातवाचा हा विशिष्ट वेळेचा ठरलेला कार्यक्रम, छान चॉकलेट, स्ट्रॉबेरी आईस्क्रीमचा स्वाद व मनमुराद गप्पा-चर्चा.
म्हणूनच माधवरावांनी आजच्या महत्त्वाच्या विषयासाठी हीच जागा निवडली. दोघांची ऑर्डर केलेली आईस्क्रीम आली व सुमीतने सरळ विषयालाच सुरुवात केली. आजोबा, पाहिलं ना आई कसं सारख अध्यात्म, देव-देव करत मागे लागते, हल्ली कुणी करत का असं, ईट्स ऑल सुपरस्टिशन्स, देव वगैरे काही नसतं. बी. प्रॅक्टिकल जग कुठं चालल आहे, फॉरीन कंट्रीजमध्ये करतं का कुणी असं अध्यात्म वगैरे, तरी ते किती पुढारलेले आहेत… असं काही सुमीत वैतागून विचारत होता. माधवरावांनी त्याला बोलू दिले, मग शांतपणे आईस्क्रीम खात बोलायला सुरुवात केली.
सुमीत, अध्यात्म व देव-देव जसं तुला वाटतं यात फरक आहे आणि अध्यात्म म्हणजे अंधश्रद्धा नव्हे. अध्यात्म म्हणजे आत्म्याचे अध्ययन, स्वत:चा शोध, आपल्या खऱया अस्तित्वाची जाणीव, सफल जीवनाचे रहस्य, यापेक्षा अधिक काय मिळवायच असतं जीवनात? परिपूर्ण व परिपक्व सुख-समाधान म्हणजे अध्यात्म, सखोल व संपूर्ण ज्ञान म्हणजे अध्यात्म. मोठमोठे विचारवंत, विद्वान, पंडित हे सर्व याचाच अभ्यास तर करत होते. अध्यात्माचा अभ्यास? सुमीतने आश्चर्याने विचारले. हो बेटा, अध्यात्म हा एक अभ्यास आहे, हे मिळवण्यासाठी सराव करावा लागतो.
सराव? अभ्यास? हे काय सांगताय आजोबा, लक्षात येत नाही? सुमीत संभ्रमीत होऊन म्हणाला.
हो बाळा, वेद, उपनिषद, वेगवेगळे ग्रंथ यामध्ये आहे जीवनाच्या शाळेचे मुख्य व महान शिक्षण. या ज्ञानाला मिळवायला कुठल्याही वय, लिंग, जात यांचं बंधन नसतं व याला शैक्षणिक ज्ञानाएवढे किंबहुना त्यापेक्षा जास्त महत्त्व आहे. कारण हे ज्ञान आत्मसात करणं कधीच संपत नाही.
आजोबा, आता शालेय अभ्यासच एवढा असतो की परत हे एवढे गंथ कधी व कसे वाचायचे? सुमीतलाही आजोबांचं मत लक्षात येत होतं. माधवराव म्हणाले, अगदी सोप आहे, इच्छा असली की मार्ग दिसतो, या सर्व गंथांचा मिळून एकच गंथ आहे, तो म्हणजे श्रीमद भगवद्गीता. असा एकमेव गंथ जो साक्षात भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून आला आहे, जो रणांगणात सांगितला गेला आहे. ज्याची जयंती साजरी होते, मुख्य म्हणजे हा ग्रंथ विज्ञानावर आधारित आहे. भारताच्या संविधानातही या ग्रंथाला मान्यता आहे. त्रैलोक्मयातलं संपूर्ण ज्ञान हे यातल्या 18 अध्यायात विभागले आहे. यामध्ये 18 अध्याय व 700 श्लोक आहेत. हे 18 अध्याय म्हणजे जीवनाचं यश आहे, परमानंदाचा अनुभव आहे. ज्या गोष्टींचा शोध आता लागला असं वाटतं त्याचा प्रत्यय श्रीमद भगवद्गीताचा अभ्यास करताना येतो.
मी तर असं म्हणेन ज्या गोष्टींची उत्तरे अजूनही विज्ञानाकडे नाहीत ती सर्व समर्पक व पुराव्यासह उकल श्रीमद भगवद्गीतामध्ये पहावयास मिळते. एक पथप्रदर्शित करणारी मार्गदर्शिका आहे. सरळ व सुलभ शब्दात सांगितले गेलेले हे ज्ञान जीवनाचं गमक आहे. ग्रंथ जरी लहान दिसत असला तरी त्याचा अभ्यास केल्यावर जीवनात काही शिकायचे बाकी रहात नाही.
कसं राहील? स्वत: भगवान श्रीकृष्णाने सांगितलेले ज्ञान आहे, हे ज्या परदेशाबद्दल, सुमीत, तु सांगत होतास ना, तेथील लोकही आपल्या या संपूर्ण ज्ञानाने परिपूर्ण श्रीमद भगवद्गीताचा अभ्यास करत आहेत. तर तुच सांग, अशा महान ग्रंथाचा वारसा घेऊन जीवनात सर्वच बाजूने यशस्वी व्हायचं की तकलादू गोष्टींच्या मागे पळायचं? तुमची आजची पिढी लहान-सहान अडचणींने खचते, नैराशामध्ये जाते, मागचा पुढचा विचार न करता नको ते कृत्य करून बसते, या सर्वांवर उपाय एकच श्रीमद भगवद्गीतेचा अभ्यास, स्वत: अनुभव घेऊनच मिळणारा आनंद आहे हा परमानंद.
सुमीत अवाप् होऊन माधवरावांकडे पहात होता. जणू त्याचे अध्यात्माविषयीचे चुकीचे समज गळून पडले होते. श्रीमद भगवद्गीतेच्या ज्ञान प्रकाशाने त्याचे बौद्धिक डोळे दिपले होते. आजोबा, इतके सुपर से उपर वालं ज्ञान आहे हे मग श्रीमद भगवद्गीता हा विषय जर शैक्षणिक अभ्यासक्रमात समाविष्ट केला तर, किती मजा येईल ना… पण मी मात्र आजच या महान गंथाचं रिडिंग सुरू करणार…
सुमीतच्या या विचाराने माधवराव भारावून गेले. कारण जर नुसत्या श्रीमद भगवद्गीता या गंथाच्या जुजबी ओळखीने सुमीतची विचार दिशाच बदलली तर जर प्रत्येकाने याचा अभ्यास केला तर केवढा सकारात्मक व आमुलाग्र बदल होईल.
– प्रीती चिंडक
योग्यवेळी योग्य वयात हे संस्काररुपी ज्ञान दिले गेलेच पाहिजे…
जीवनाची घडी अध्यात्माच्या मदतीने, नीती मूल्याने पूर्ण जर व्यवस्थित बसायची असेल तर योग्यवेळी योग्य वयात हे संस्काररुपी ज्ञान दिले गेलेच पाहिजे. शैक्षणिक अभ्यासक्रमात श्रीमद भगवद्गीतासारखे विषय असलेच पाहिजेत. सुमीत व माधवराव दोघांच्याही चेहऱयावर घरी परतताना काही तरी मोठे गवसले या परमानंदाच्या समाधानाचं तेजाचं स्मित पसरलं होतं.