भारताचे साहाय्य, रामेश्वरम येथे शिबीर स्थापन करण्यासाठी सज्जता
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
महागाईचा अक्षरशः भडका उडालेल्या श्रीलंकेतील हजारो शरणार्थी अन्नपाण्याच्या शोधार्थ भारतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे शरणार्थी प्रामुख्याने उत्तर श्रीलंकेतील असून ते तामिळ भाषिक आहेत. भारताने या शरणाथीँना काही काळापुरता आ़श्रय देण्याची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. त्यानुसार तामिळनाडूतील रामेश्वरम येथे शिबीर सज्ज केले जाईल.
यापूर्वीच काही शरणार्थी भारतात पोहचले आहेत. ते दोन नौकांमध्ये बसून तामिळनाडूत आल्याचे स्पष्ट करण्यात आले. प्रारंभी त्यांनी विदेशी म्हणून अटक करण्यात आली होती. हे शरणार्थी तामिळ आहेत. त्यांचा निवास आणि आहार यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या शरणाथीँनी तेथील परिस्थिती किती गंभीर आहे, यावर पत्रकारांशी बोलताना प्रकाश टाकला. असे हजारो शरणाथीँ येत असून त्यांना यापुढे श्रीलंकेचे तामिळ नागरीक असे मानून त्यांची व्यवस्था केली जाणार आहे. यासाठी विशेष शिबीरांची व्यवस्था प्रशासनाने चालविली आहे.
भारताचे नैतिक दायित्व
संकटात सापडलेल्या श्रीलंकेच्या नागरीकांना साहाय्य करणे हे भारत आपले नैतिक दायित्व मानतो, असे प्रतिपादन काही सरकारी अधिकाऱयांनी केले आहे. विशेषतः उत्तर श्रीलंकेतील तामिळ भाषिक सांस्कृतिक दृष्टीने भारताशी जोडले गेलेले आहेत. त्यामुळे त्यांना साहाय्य केले जात आहे. केंद्र सरकार आणि तामिळनाडू सरकार त्या दिशेने प्रयत्नशील आहे, असे स्पष्ट करण्यात आले.
मच्छीमार संघटना सक्रीय
श्रीलंकेतील तामिळ भाषिकांना भारताने आपलेसे करावे यासाठी तामिळनाडूतील काही मच्छीमार संघटना सक्रीय झाल्या आहेत. भारतात बेकायदा येणाऱयांना सध्यातरी तामिळ नागरीक मानावे, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यांच्यावर बेकायदा भारतात आल्यामुळे कायदेशीर कारवाई करु नये. त्यांना आश्रय द्यावा आणि परिस्थिती सुधारल्यावर श्रीलंकेत त्यांची पाठवणी करावी, असे या संघटनेचे मत असले तरी केंद्र सरकारला आपली परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा लागणार आहे. सध्या साहाय्याचा हात पुढे केला असला तरी शरणार्थींची संख्या वाढल्यास भारतातही समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे भारताने सध्या समतोल भूमिका घेतली असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले आहे.
धोका पत्करुन भारतात
आतापर्यंत 400 शरणार्थी भारतात पोहचले असल्याची माहिती आहे. खवळलेल्या समुद्राची पर्वा न करता ते साध्या नौकांमधून भारतात आले आहेत. भारताने श्रीलंकेला आतापर्यंत 4000 टन अन्नधान्याचे साहाय्य केले असून भविष्यकाळात आणखी वाढ केली जाऊ शकते. तथापि, भारत मोठय़ा संख्येने शरणार्थींची व्यवस्था करु शकणार नाही, असेही तज्ञांचे म्हणणे आहे.
तांदूळ 500 रुपये किलो
श्रीलंकेत एका किलो तांदळाची किंमत आता 500 रुपयांपर्यंत जाऊन पोहचली आहे. तसेच साखर 290 रुपये प्रतकोच्या दराने विकली जात आहे. दूध भुकटीचा (मिल्क पावडर) दर 400 ग्रॅमला 790 रुपये आहे. पाच सहा जणांच्या एका परिवाराला केवळ खाण्यापिण्यासाठी प्रतिदिन किमान 2 हजार रुपये खर्च करावे लागतात. आम्ही श्रीलंकेतच राहिलो असतो, तर उपासमार होऊन आमचा मृत्यू झाला असता, असे विधान भारतात आलेल्या शरणार्थींनी ही माहिती दिली.
श्रीलंकेत हाहाकार
ड प्रचंड महगाई आणि टंचाईमुळे श्रीलंकेत नागरीक मेटाकुटीला
ड तांदूळ, साखर, दूध आणि भाजीपाल्याचे तर भिडले गगनाला