आशा भवनमध्ये फळ व केमिकलचे वाटप
प्रतिनिधी/ सातारा
येथील नवीन एमआयडीसीमध्ये असणाऱया श्री केमिकल इंडस्ट्रिजने सामाजिक बांधिलकी जोपासत आपली परंपरा कायम ठेवली. कोरोनाच्या संकटातही मदतीचा हात पुढे सरसावत आशा भवन या मतीमंद मुलांच्या शाळेत फळे तसेच केमिकलचे वाटप केले.
श्री केमिकल्सचे मालक श्रीलेश कांबळे व त्यांच्या पत्नी प्रज्ञा कांबळे या सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असतात. कोरोनाच्या संकटात अनेकजण भरडले आहेत. परंतु त्यांनी आपल्या कंपनीतील कर्मचाऱयांप्रतीही सहानुभुती दर्शवली आहे. त्याचबरोबर कोरोनाचा हाहाकार सुरु असताना स्वच्छतेला सर्वात जास्त महत्व दिले जात असल्यामुळे कांबळे दाम्पत्यांनी मतीमंद मुलांच्या आशाभवनमध्ये प्रत्यक्षात जाऊन केमिकलचे वाटप केले. तसेच त्या मुलांच्या आरोग्याच्या बळकटीसाठी फळांचे वाटप केले. कांबळे दाम्पत्याचे आशाभवनचे फादर यांनी आभार मानले.