उदय सामंत यांचे मत : वैभववाडीत कोरोना स्थितीचा घेतला आढावाः म्हणाले, ही वेळ टीका करण्याची नाही!
प्रतिनिधी / वैभववाडी:
श्रेयवादापेक्षा आम्हाला जनतेची सेवा महत्वाची वाटते. जनतेच्या हिताच्या कोणत्याही कामात सांघिक कामगिरीची गरज असते. मात्र, विरोधकांना श्रेयवाद महत्वाचा वाटतो, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी वैभववाडी येथे सांगितले.
कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री सामंत यांनी वैभववाडी तहसील कार्यालयात भेट दिली. यावेळी शिवसेना नेते संदेश पारकर, अतुल रावराणे, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार रामदास झळके, पोलीस निरीक्षक अतुल जाधव, जिल्हा बँकेचे संचालक दिगंबर पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी खलिपे, तालुका आरोग्य अधिकारी अनिल पवार, सहाय्यक गटविकास अधिकारी शुभदा पाटील, तालुकाप्रमुख मंगेश लोके, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी सुरज कांबळे आदी उपस्थित होते. तालुक्मयाला दहा ऑक्सिजन बेड तसेच सेमी विद्युत दाहिनी देण्याच्या सूचना सामंत यांनी दिल्या. तालुक्मयाचा कोरोना रुग्णांचा मृत्यूदर 3.6, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.42 आहे. तालुक्मयात आतापर्यंत 934 कोरोनाबाधित आढळले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
‘खनिकर्म’कडून जिल्हय़ाला रुग्णवाहिका
जिह्याला खनिकर्म विभागाकडून रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. खनिकर्म विभागाचा अध्यक्ष हा पालकमंत्री असतो. माजी मंत्री दीपक केसरकर सोडून जे काम एकाही पालकमंत्र्याला जमले नाही, ते काम आपण केले आहे. मात्र, येथे फुकटचे श्रेय घेण्याचे काम होत आहे. कोरोना महामारीत आज लोकांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही प्राधान्य देत आहोत. त्यामुळे श्रेयवाद बाजूला ठेवून सांघिकतेने काम करण्याची गरज आहे. मात्र, विरोधकांकडून तसे होताना दिसत नाही. ही दुर्दैवाची बाब आहे, असे सामंत म्हणाले.
ही वेळ टीका करण्याची नाही
खनिकर्म विभाग व राज्य शासनाच्या माध्यमातून विधानसभा मतदारसंघात तीन रुग्णवाहिका देत आहोत. हे करताना आम्ही पक्षीय राजकारण केले नाही. जिल्हा परिषद वेगळय़ा विचारांची असली, तरी जनतेच्या हितासाठी जे आवश्यक आहे, ते कोणतेही श्रेय न घेता देत आहोत. विरोधकांच्या टीकेला केव्हाही उत्तर देऊ शकतो. पण ही टीका करण्याची वेळ नाही. पुढील निवडणुकीत नक्की श्रेयवादावर बोलू, असेही ते म्हणाले.
निधी देताना श्रेयवाद केला नाही
फोंडा-वैभववाडी राज्यमार्गाच्या कामाची निविदा झाली आहे. लवकरच हे काम सुरू होईल. पुढील 15 ते 20 वर्षांची लोकसंख्या गृहित धरून नियोजन करण्यात येत आहे. वैभववाडी शहराच्या नळयोजनेसाठी दोन कोटी रुपये, महाराणा प्रताप कलादालनाला 25 लाख रुपये, पं. स. इमारतीच्या कामाला 37 लाख रुपये, प्लाझ्मा डोनेट मशीनसाठी 25 लाख रुपये तसेच तालुक्मयात ऑक्सिजन प्लॅन उभारणीसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. एवढा निधी तालुक्मयासाठी देताना आम्ही श्रेयवाद करीत बसलो नाही, असे ते म्हणाले.
… तर चारवेळा निवडून आलो नसतो – सामंत
महाराणा प्रताप कलादालन अर्धवट कोणी ठेवलं? भाजपचे नगरसेवक शिवसेनेत का आले?, अशा अनेक बाबींवर आपण बोलू शकतो. काहींना शिवसेनेची व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऍलर्जी आहे. आपण केवळ आश्वासने दिली असती, तर जनतेने रत्नागिरी मतदारसंघातून चारवेळा निवडून दिले नसते, असेही सामंत म्हणाले.