ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशातील कोरोनाची दुसरी लाट आता हळूहळू ओसरत आहे. सोमवारी देशात 1 लाख 27 हजार 510 नव्या संक्रमितांची नोंद झाली असून, मागील 55 दिवसातील हा सर्वात कमी आकडा आहे. यापूर्वी 7 एप्रिलला 1 लाख 26 हजार 276 संक्रमित रुग्ण आढळले होते. मागील 24 तासात 2 लाख 55 हजार 2795 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर 2795 रुग्ण दगावले. मृतांचा हा आकडाही 35 दिवसानंतर 3 हजारांच्या खाली आहे. 26 एप्रिलला 2762 रुग्णांनी जीव गमावला होता.
देशात आतापर्यंत 2 कोटी 81 लाख 75 हजार 044 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 2 कोटी 59 लाख 47 हजार 629 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. सध्या 18 लाख 95 हजार 520 रुग्ण उपचार घेत आहेत. तर 3 लाख 31 हजार 895 रुग्णांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत.
आतापर्यंत देशातील 21 कोटी 60 लाख 46 हजार 638 नागरिकांना लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे. सोमवारी देशात 19 लाख 25 हजार 374 कोरोना चाचण्या करण्यात आल्या.