प्रतिनिधी / बेळगाव
भल्या पहाटे किलबिलाट करणारी चिऊताई आज दुर्मीळ झाली आहे. विज्ञानाने प्रगती केली असली तरी पशु-पक्ष्यांच्या अस्तित्वावर मात्र याचा परिणाम झाल्याचे दिसत आहे. आपल्या चिवचिवाटाने माणसाचे भावविश्व समृद्ध करणाऱया चिऊताईंची संख्या घटली आहे. आज जागतिक चिमणी दिवस. या निमित्ताने चिऊताईंची संख्या का कमी झाली? याचा शोध घेण्याची गरज पक्षीप्रेमींतून व्यक्त होत आहे.
आपल्या घरासभोवती चिव चिव असा आवाज करणाऱया चिऊताईंची संख्या अलीकडच्या दहा वर्षात फारच कमी झाली आहे. माणसाचे जगणे आणि भावी पिढीचे बालपण रम्य करण्यासाठी चिऊताईंचे अस्तित्व अन् वैभव जपणे काळाची गरज बनली आहे. झाडावर आणि घराच्या अडगळीत घरटे बांधून आपल्या पिलांसाठी धावपळ करणाऱया चिऊताईचे दर्शनही दुर्मीळ बनले आहे. त्यामुळे चिऊताईंची संख्या वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होणे आवश्यक आहे.
मोबाईल रेंजचा धोका
अलीकडच्या दहा वर्षांत विविध कंपन्यांच्या मोबाईल टॉवर्सची संख्या झपाटय़ाने वाढली आहे. या मोबाईलच्या रेंजमुळे पक्ष्यांचे अस्तित्व धोक्मयात आले आहे. विशेषतः चिमण्यांची संख्या झपाटय़ाने कमी झाली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत चिमण्यांचा थवा तर सोडाच एक चिमणी दिसणेही दुर्मीळ झाले आहे. त्यामुळेच आपल्या किलबिलाटाने सर्वांचे लक्ष वेधून घेणारी चिऊताई गेली कुठे? असा प्रश्न पक्षीपेमींबरोबर सर्वसामान्यांना पडला आहे.
घटती झाडांची संख्या
अन् प्रदूषणात वाढ
मोबाईल रेंज, वायफाय, प्रदूषण यामुळे पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे. परसात आणि आपल्या आजूबाजूला झाडांची संख्या अधिक होती. त्यामुळे नैसर्गिक अधिवासामुळे पक्षी टिकून होते. मात्र, हल्ली वाढत्या शहरीकरणामुळे झाडे नष्ट झाली आणि पशु-पक्ष्यांच्या अस्तित्वालाही धोका निर्माण झाला.
जबाबदारी प्रत्येकाची
जी. पी. हर्षाबानू (उपवन संरक्षणाधिकारी)
पशु-पक्षी हे आपले दागिने असून त्यांचे संवर्धन करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. पशु-पक्ष्यांचे संरक्षण ही फक्त सरकारचीच जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी, पक्ष्यांच्या संरक्षणासाठी जागृती होणे आवश्यक आहे.
आत्मपरीक्षण आवश्यक
अमन उसुलकर (पक्षीप्रेमी)
तांत्रिक प्रगतीचा फटका पक्ष्यांना बसला आहे. विशेषतः मोबाईल रेंज, वायफाय आणि प्रदूषणामुळे पक्ष्यांची संख्या घटली आहे. आजूबाजूला असलेली झाडे कमी झाल्याने चिमण्यांचे अस्तित्व धोक्मयात आले आहे. यासाठी चिमण्यांची संख्या का कमी झाली? याचे आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे.