संगणक हे आज विविध क्षेत्रामध्ये विविध प्रकारच्या व्यक्ति समूहाद्वारे आणि विविध कार्यासाठी वापरले जाणारे यंत्र आहे. एकविसाव्या शतकात संगणकाने मानवाच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत. तर सध्याचे युग हे संगणकाचे युग म्हणून ओळखले जाते.
संगणक अर्थात कॉम्प्युटर नावाच्या या यंत्राने आजच्या समाज जीवनावर सर्वांगीण परिणाम केलेला आहे. संगणक हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण असून यांत चिन्हावर प्रक्रिया करणारी पद्धती किंवा व्यवस्था असून त्याची रचना व व्यवस्थापन असे असते की, ज्यामुळे माहिती स्वीकारणे, साठविणे व संस्कारित करणे आणि निकाल किंवा उत्तरे तयार करणे या प्रक्रिया आधीच साठवून ठेवलेल्या पायऱया पायऱयांनी बनलेल्या सूचनाबरहुकूम आपोआप केल्या जातात. संगणकाचा रेल्वे, विमान, आरोग्य, बँक, उद्योगधंदे, शिक्षण, संशोधन, विमाक्षेत्र, विद्युत विभाग इत्यादी क्षेत्र विभागात विविध कार्यांसाठी उपयोग केला जात असल्याने आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात संगणकीय ज्ञान असणे गरजेचे आहे. जेणेकरून स्पर्धेच्या युगात टिकता येईल.
आजच्या युगात संगणकाचे अनन्य साधारण महत्व दिले जाते. संगणकाला इंग्लिशमध्ये कॉम्प्युटर असे म्हणतात. ण्दस्ज्ल्tाr हा शब्द कॉम्प्युट या इंग्लिश क्रियापदापासून बनला आहे. ण्ध्श्झ्ळऊRिं म्हणजे आकडेमोड किंवा गणना करणे. 50 वर्षापूर्वी जेव्हा कॉम्प्युटर हा शब्द प्रचलित झाला तेव्हा संगणक या यंत्राचा वापर मुख्यतः आकडे मोड करण्यासाठीच केला जात असे, परंतु दिवसेंदिवस या यंत्रात अनेक सुधारणा होत गेल्या व अलीकड़े संगणकाचा वापर तर अनेक प्रकारे होवू लागला आहे. त्यामध्ये माहिती पाठवणे, तिचे वर्गीकरण करणे इतकेच नाही तर ध्वनी निर्मिती, चित्रीकरण अन्य असंख्य कामासाठी संगणकाचा वापर होवू लागला आहे. तसेच संगणक हे माहिती स्वीकारणारे, दिलेल्या सूचनानुसार माहिती प्रक्रिया करून अचूक उत्तर देणारे वेगवान इलेक्ट्रॉनिक्स यंत्र असल्याने यामुळे मानवी जीवनात झपाटय़ाने आमुलाग्र बदल घडून कामाचे ओझे कमी झाले. संगणकाचा वापर दैनंदिन जीवनात पदोपदी होत असलेला दिसून येतो. संगणकज्ञानामध्ये झालेल्या प्रचंड वाढीमुळे संगणक शिक्षणक्षेत्रात देखील वेगवेगळय़ा कार्यासाठी एक साधन म्हणून उपयुक्त साधन बनत आहे.
संगणक ही 20 व्या शतकातील क्रांती आहे. चार्ल्स बॅबेजने निर्माण केलेल्या या उपकरणाने हे जग व्यापून घेतले आहे. आजचे युग संगणक युग आहे. आजकाल संगणकाशिवाय कसलेही काम होत नाही. या संगणकाचे खूप फायदे असून सगळी कामे पटापट आणि वेळेवर होतात. संगणकाला विश्रांतीची गरज नसते. फक्त पुरेशी चार्जिंग करायचं की झाले काम.
इंटरनेटमुळे हे जग जवळ येत चालले आहे. नातेवाईकांशी संपर्क सुलभ झाला आहे. अनेक संशोधनासाठी संगणकाचे विशेष योगदान आहे. त्यामुळे आजच्या स्पर्धेच्या व आधुनिक टिकविण्यासाठी संगणकीय ज्ञान महत्त्वाचे असून ते ज्ञान आत्मसात करणे काळाची गरज बनली आहे.
संगणक कोणतेही काम काही सेकंदांत, अत्यंत वेगाने व बिनचुक करीत असल्याने हा त्याचा सर्वात मोठा फायदा मानवी जीवनात होत असून मानवी जीवनात आमुलाग्र बदल झपाटय़ाने वाढू लागले आहे. त्यामुळे संगणकीय ज्ञान प्रत्येकाला असणे गरजेचे आहे. त्याच अनुषंगाने गरीब गरजू वाडीवस्तीमधील विद्यार्थ्यांला संगणकाचे महत्त्व व फायदे समजून ते ज्ञान मिळावे या उद्देशाने अविरत फाऊंडेशनच्या माध्यमातून गेल्या काही वर्षापासुन संगणक व लॅपटॉप वाटप करण्यात आले असून यापुढेही वाटप करण्यात येणार असून गरीब गरजू विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात टिकवण्याचा प्रामाणिक प्रयत्न बऱयाच कंपन्या करीत आहेत.