प्रतिनिधी/ बेळगाव
क्रांतीवीर संगोळ्ळी रायण्णा यांचा पिरनवाडी येथे बसविण्यात आलेला पुतळा हटविण्यात आला आहे. 15 ऑगस्ट रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्याच दिवशी रायण्णांची जयंती असते. पिरनवाडी येथे या क्रांतिवीराचा पुतळा बसविण्यात यावा, या मागणीसाठी विविध संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
हालूमत महासभासह विविध संघटनांनी जिल्हाधिकाऱयांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. 15 ऑगस्ट रोजी संगोळ्ळी रायण्णा यांचा जन्म झाला होता. तर 26 जानेवारी रोजी त्यांना ब्रिटिशांनी नंदगड, ता. खानापूरजवळ अन्यायाने फाशी दिली. स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताकदिन हे दोन्ही दिवस संगोळ्ळी रायण्णा यांच्या जीवनात महत्त्वाचे आहेत. असे उदाहरणही विरळच आहे.
पिरनवाडी येथे बसवण्यात आलेला पुतळा पोलिसांनी हटवला आहे. त्याची त्वरित प्रति÷ापना करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आक्षेप घेतला होता. त्यामुळे पोलिसांनी पुतळा हटविला होता. तो पुतळा पुन्हा बसविण्यासाठी दबाव वाढवण्यात आला आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही या घडामोडींसंबंधी अधिकाऱयांकडून माहिती घेतली आहे..