निर्बंध लागूच राहणार
प्रतिनिधी /पणजी
राज्यव्यापी संचारबंदीत आणखी एका आठवडय़ाने वाढ करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने रविवारी तसा आदेश जारी केला आहे. त्यानुसार संचारबंदीची मुदत दि. 16 ऑगस्ट पर्यंत राहणार आहे.
यापूर्वी 2 ते 9 ऑगस्टपर्यंत संचारबंदीत वाढ करण्यात आली होती. आता त्यात आणखी एका आठवडय़ाचा वाढ करताना 16 ऑगस्ट रोजी सकाळी 7 पर्यंत संचारबंदी लागू राहील असे आदेशात म्हटले आहे. सामाजिक अंतराचे पालन करणे सक्तीचे असल्याचे निर्देश देण्यात आले आहेत.