केरळमधून येणाऱयांना आरटीपीसीआर चाचणी सक्तीची
प्रतिनिधी /पणजी
राज्य सरकारने संचारबंदीची मुदत आणखी एका आठवडय़ाने वाढवली असून ती 20 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत कायम ठेवली आहे. या संचारबंदी वाढीत पुर्वीचेच नियम, अटी कायम ठेवण्यात आल्या असून त्यात कोणताही बदल केलेला नाही. लोकांनी मास्क वापरावा, समाजिक अंतराचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
केरळमधून येणाऱया प्रवाशांना अतिरिक्त निर्बंध लादण्यात आले असून आरटीपीसीआर चाचणी सक्तीची केली आहे. विद्यार्थी, कर्मचारी यांना होम किंवा इन्स्टिटय़ूशन क्वारंटाईनची सक्ती करण्यात आली असून तो कालावधी 5 दिवसांचा ठेवण्यात आला आहे. आरटीपीसीआर चाचणीसह होम क्वारंटाईन देखील सक्तीचे आहे, असे जिल्हाधिकाऱयांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. दोन्ही डोस घेतलेल्या प्रवाशांना त्याचे प्रमाणपत्र दाखवावे लागेल व त्यांना या सक्तीमधून वगळण्यात आले आहे. चाचणीत जे पॉझिटिव्ह आढळतील त्यांना गोवा प्रवेश नाकारण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे. इतर राज्यातून गोव्यात येणाऱया प्रवाशांना पर्यटकांना 72 तास मुदतीचा निगेटिव्ह अहवाल बंधनकारक असून तो सोबत आणणे आवश्यक आहे.