सोलापूर/प्रतिनिधी
संचार बंदीच्या आदेशाचे उल्लंघन करून दुकाने उघडणाऱ्या नवीपेठेतील 28 व्यापाऱ्यांना फौजदार चावडी पोलीस आणि ताब्यात घेतले. त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.
कोरोना विषाणुचा प्रभाव कमी करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून खबरदारीची अनेक उपाय योजना करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील जुनी बाजारपेठ म्हणून ओळखली जाणारी नवी पेठ मागील 46 दिवसांपासून बंद आहे. दरम्यान दोन दिवसांपासून नवी पेठ पुन्हा व्यापारासाठी खुली केली जाणार अशी अफवा सुरू होती. व्यापारी असोसिएशनच्या वतीने अशा कोणत्याच अफवांवर व्यापाऱ्यांनी विश्वास ठेवू नये, असा खुलासा करण्यात आला होता. परंतु गुरुवारी सकाळी नवीपेठेतील काही व्यापाऱ्यांनी त्यांची दुकाने उघडली होती. याबाबतची माहिती फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साळुंखे यांना समजताच त्यांनी तातडीने नवी पटेल धाव घेतली. त्यांनी व्यापाऱ्यांकडे दुकाने उघडण्याबाबत का खुलासा मागितला असता व्यापाऱ्यांकडे कोणतेही कायदेशीर कागदपत्रे आढळून आली नाही. यामुळे त्यांनी 28 व्यापाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर जिल्हाधिकारी तसेच पोलीस आयुक्त यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात येत आहे.
शहरात 24 मार्च पासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू असल्याने व्यापाऱ्यांचा मोर मोठे संकट उभारले आहे. कोणाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढतच चालल्याने व्यवसायावर त्याचा मोठा परिणाम जाणवत आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. दरम्यान दोन दिवस सुरू असलेल्या अफवां मुळे व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली असल्याची चर्चा परिसरात होती. व्यापाऱ्यांची आर्थिक गणिते संपूर्णपणे बिघडली असल्याने यांचा संयम कमी होत असल्याची चर्चाही परिसरात होती.