प्रतिनिधी / कोल्हापूर
आज संपूर्ण जगभरात व भारतात कोरोना व्हायरस मुळे मानवी जीवन अडचणीत सापडले आहे. भारत देशात 21 दिवसांची संचारबंदी असल्याने हातावर पोट असणाऱ्या परप्रांतीयांचे मोठे नुकसान होत आहे. कोरोणामुळे आज अनेक उद्योगधंदे बंद पडले आहेत .संपूर्ण भारतात संचारबंदी लागू असताना रोजंदारीवर काम करणारे परप्रांतीय नागरिक कोल्हापूरात मोठ्या संख्येने आहेत . त्यानी संचारबंदी काळात कुठे जाऊ नये, तसेच त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये, म्हणून आमदार पी.एन.पाटील यांच्या वतीने गरजूंना धान्य व गॅस वाटप तसेच त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
करवीर विधानसभेचे आमदार पी. एन. पाटील, तसेच जिल्हा परिषद सदस्य राहुल पाटील यांनी सूतगिरणी मध्ये काम करणाऱ्या परप्रांतीय कामगारांना दोन- तीन महिने पुरेल एवढे अन्नधान्य, तेल, गॅस सिलेंडर व इतर घरगुती वस्तू ही दिलेल्या आहेत. संचारबंदी च्या काळात कामगारांना केलेली मदत ही मोलाची ठरत असून या मूळे कामगारांचा असलेला पोटापाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे .