मंत्री विजय वडेट्टीवार यांचे संकेत- दोन दिवसात होणार निर्णय
प्रतिनिधी/मुंबई
राज्यात 30 एप्रिलपर्यंत संचारबंदी असताना त्याचे योग्य परिणाम दिसत नसल्याने राज्य सरकारही आता लॉकडाऊन करण्याच्या विचारात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत येत्या दोन दिवसात निर्णय घेतील, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
राज्यात 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंधांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आलेली दिसत नाही. दैनंदिन रुग्णसंख्या वाढत असून राज्य सरकारची चिंता वाढली आहे. दिल्लीत नुकताच सहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला असून कशा पद्धतीने अंमलबजावणी होणार आहे याची माहिती घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
संचारबंदीचा फायदा सध्या पाहिजे त्या प्रमाणात दिसत नाही. आपण लॉकडाऊन केलेला नाही. अनेक व्यापाऱयांचा लॉकडाऊनला विरोध होता. पण आज व्यापारी किंवा जीवनाश्यक वस्तूंची तसेच इतर लहान दुकान असणारेही लॉकडाऊन 100 टक्के करा, अशी मागणी करत आहेत. अनेक जिह्यांमध्येही लोक मागणी करत असून मुख्यमंत्र्यांना यासंबंधी माहिती दिली आहे. दोन दिवसात कडक लॉकडाऊनसंबंधी निर्णय अपेक्षित आहे. मुख्यमंत्री इतरांशी चर्चा करुन तो निर्णय घेतील, असे मंत्री वडेट्टीवार म्हणाले. कोरोनाच्या दुसऱया लाटेने अंदाज चुकवला आहे. ही लाट मागच्या वर्षापेक्षाही तीव्र निघाल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
दिल्लीने कडक लॉकडाऊन केला असून त्याची नियमावली काय आहे यावर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. सर्व माहिती गोळा केल्यानंतर लॉकडाऊनचे स्वरुप ठरवून नंतर निर्णय घेण्यात येईल, असे वडेट्टीवार म्हणाले.