ऑनलाईन टीम / मुंबई :
शिवसेनेने भाजपचा हात सोडून राज्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केले. त्यांनतर तब्बल दीड वर्षांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेवर 7 फेब्रुवारी रोजी थेट वक्तव्य केले. अमित शहा म्हणाले होते की, ‘शिवसेनेने बाळासाहेब ठाकरेंच्या तत्वांना तापी नदीत बुडवले आणि सत्तेवर जाऊन बसले. आम्ही तुमच्या मार्गाने चालत नाही. तुमच्या मार्गाने चाललो असतो तर महाराष्ट्रात शिवसेनाच उरली नसती.
त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा ट्विट करत भाजपचे कान टोचले आहेत. “घमंड ज्यादा हो तो, हस्तीयाँ डूब जाती है”, म्हणत त्यांनी अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.
“तुफान ज्यादा हो तो,
कश्तियाँ डूब जाती है
और घमंड ज्यादा हो तो,
हस्तीयाँ डूब जाती है.
असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.