ऑनलाईन टीम/तरुण भारत
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत आज बैठक पार पडली. या बैठकीत त्यांच्यामध्ये जवळपास २० ते २५ मिनिटं चर्चा झाली. पण या चर्चेचा तपशील काय होता? नेमकी कशासंदर्भात चर्चा झाली याची माहिती स्वत: शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या निवडीचा विषय आणि शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्यावरील ईडीच्या कारवाई संदर्भात पंत्परधान मोदींसोबत चर्चा केली, अशी माहिती शरद पवार यांनी दिली.
यावेळी पवार म्हणाले, “पंतप्रधानांबरोबर महाराष्ट्रातील कोणत्याही कारवायांबद्दल चर्चा केली नाही. तर लक्षद्वीपच्या प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली. तसेच संजय राऊत यांच्यावरील कारवाईचा मुद्दा मी यावेळी मांडला. त्यांच्यावर अन्याय झाला असून या कारवाईची गरजच काय होती? असा सवालही पवारांनी उपस्थित केला. तसेच विधानपरिषदेच्या बारा आमदारांच्या प्रलंबित नियुक्त्यांवर या बैठकीत चर्चा झाली” असे पवार म्हणाले.
शरद पवारांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी मोदींसोबत काय चर्चा केली यासंदर्भात विचारण्यात आलं. त्यावर ते माहिती देताना म्हणाले की, “संजय राऊत राज्यसभेचे माझी सहकारी, सामनाचे संपादक त्यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवाई केली आहे. त्यांचं फ्लॅट आणि अर्धा एकर जमीन जप्त केली आहे. हा अन्याय आहे. राज्यसभा सदस्य आणि जेष्ठ पत्रकार असल्याने मी ही गोष्ट पंतप्रधान मोदींच्या कानावर टाकली, तसेच नवाब मालिकांच्या कारवाईविषयी कोणतीही चर्चा केली नाही” असे शरद पवार यांनी सांगितलं.
तसेच गेल्या अडीच वर्षांपासून १२ आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा प्रलंबित आहे, त्यावरही राज्यपालांनी अद्याप निर्णय घेतला नाही. त्यामुळे हे दोन विषय मोदींच्या कानावर घातले. या २ विषयांवर मोदी नक्की विचार करतील आणि ते निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे, अशी माहिती यावेळी पवारांनी दिली आहे
शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे
महाविकास आघाडी सरकार ५ वर्षे कालावधी पूर्ण करणार
भाजपसोबत आमचे कोणतेही संबंध नव्हते आणि नाहीत
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना भाजपविरोधात उभी आहे
संजय राऊतांवरील कारवाईबाबतचा मुद्दा मांडला
नवाब मलिकांवरील कारवाईबाबत कुठलीही चर्चा मोदींशी झाली नाही
संजय राऊतांवर कारवाई करण्याची गरज काय होती
१२ आमदारांच्या प्रश्नावर मोदी विचार करून योग्य निर्णय घेतली
१२ आमदारांच्या प्रश्नावर मोदी विचार करून योग्य निर्णय घेतली
महाराष्ट्रातील कारवायांबाबत कोणतीची चर्चा मोदींसोबत झाली नाही
महाराष्ट्रातील कारवायांबाबत कोणतीची चर्चा मोदींसोबत झाली नाही
विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्तीच्या १२ सदस्यांबाबत मोदींसोबत चर्चा झाली
लक्षद्वीपमधील काही मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत बैठक झाली