मुंबई प्रतिनिधी
अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीत 11 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्ष नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.या दुर्घटनेचा निषेध व्यक्त करत संजय राऊत यांनी केंद्र सरकावर निशाणा साधला होता. यावरून आता चित्र वाघ यांनी राऊतांना खरमरीत शब्दात उत्तर दिलं आहे. सर्वज्ञानी संजय राऊत नगरच्या आगीच खापर केंद्रावर फोडत आहे. पण व्हेंटिलेटर नव्हे संजय राऊत यांची मानसिकताच निकृष्ट बनलीय” अशी टीका वाघ यांनी केली आहे.
“डॉक्टर, नर्स यांना बडतर्फ करण्यात सरकार कोणता पुरुषार्थ दाखवतेय. नगर दुर्घटना ही दुर्देवी घटना आहे. हे सरकारी अनास्थेचे बळी आहेत. डॉक्टर आणि काही नर्सला बडतर्फ केले. त्यांचे हे कामच नाही. कारवाई करायची असेल ,तर वैद्यकीय अभ्यासक्रमात आग नियंत्रणाचा समावेश करा” असा सल्ला वाघ यांनी राज्य सरकारला दिला आहे.”आगीत होरपळलेल्यांची चिंता संजय राऊतांना नाही. उलट राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोघांची मर्जी सांभाळावी लागतेय. उदय शेट्टी आणि मजनू मध्ये त्यांचा घुंगरू सेठ झाला आहे.” असे म्हणत वाघ यांनी राऊतांची खिल्ली देखील उडवली.
अकरा लोकांचे बळी घेऊनही सरकारची भूक संपलेली नाही. एक वर्ष जुनी इमारत असूनही आग कशी लागते” असा प्रश्न चित्रा वाघ यांनी राज्य सरकारला विचारला आहे.