बेळगाव : अनगोळ चौथ्या क्रॉसजवळील संत रोहिदासनगर रस्त्यावर जो विद्युतखांब आहे तो धोकादायक आहे. तो कोसळण्याच्या मार्गावर आहे. या रस्त्यावर अनगोळ-मजगाव-संत रोहिदासनगर येथील नागरिक आणि विद्यार्थीही ये-जा करत असतात. या परिसरात वसती वाढली आहे. तेंव्हा तो धोकादायक खांब तातडीने हटवावा, अशी मागणी होत आहे. सतत गजबजलेला रस्ता म्हणून या रस्त्याकडे पाहिले जाते. या रस्त्यावरून उद्यमबागचे कामगार तसेच विद्यार्थी आणि नागरिक ये-जा करतात. सदर सिमेंटचा खांब खराब झाला आहे. सिमेंट पडून त्यामधील लोखंडी सळय़ा बाहेर आल्या आहेत. तो खांब कमकुवत झाला आहे. अवकाळी पाऊस-वाऱयामुळे कधी कोसळेल याची शाश्वती नाही. तेंव्हा तातडीने तो खांब हटवावा, अशी मागणी करण्यात येत आहे. यापूर्वी बऱयाच ठिकाणी असे धोकादायक खांब कोसळून मोठय़ा दुर्घटना घडल्या आहेत. तेंव्हा दुर्घटना घडण्यापूर्वीच हा खांब हटविणे गरजेचे आहे. अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकते. तेंव्हा हेस्कॉमने विद्युत खांब बदलावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
Previous Articleखासबागमध्ये होळी कामाण्णा मूर्तीची प्रतिष्ठापना
Next Article दि.आदर्श मल्टिपर्पज सोसायटीचा वर्धापन दिन साजरा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.