भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे भाकित
प्रतिनिधी / कोल्हापूर
महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वच पातळीवर अस्वस्थता आहे. कोणाचा पायपोस कुणाला नाही. कोण दिल्लीला पळत आहे, कोण मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षावर जात आहे. दोन दिवसापासून नुसती धावपळ सुरु आहे. सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन वाझे प्रकरणावरुन मंत्रीमंडळ अस्वस्थ आहे. त्यामुळे आणखी एका मंत्र्यांची संध्याकाळपर्यंत विकेट पडणार आहे.
असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. देशमुख किती वाजेपर्यंत राजीनामा देतात ते पहावे लागेल. असे म्हणत त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनाम होणार असल्याचे संकेत दिले. सरकराच्या कामगिरीवर आमदार नाराज आहेत. कामे होत नाहीत. आमदारांची नाराजी उमटू नये या भीतीपोटीच विधानसभा अध्यक्ष निवडणूक घेतली नाही. सर्व काही अबादी अबाद असते तर काँग्रेसने या निवडीवर पेढे का वाटले नाहीत. असा खोचक सवालही त्यांनी केला.