पणजी : म्युझियम ऑफ गोवा (मोग) तर्फे गोमंतकीय साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या संपदा कुंकळकर (युवा पुरस्कार) आणि वेनिता कुएल्ह? (बाल साहित्य पुरस्कार) यांचा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. भाई मावजो यांनी या दोन्ही विजेत्यांच्या घेतलेल्या मुलाखतीने एक वेगळी उंची गाठली.
लेखकाला सामाजिक भान असावे का या प्रश्नावर दोन्ही लेखिकांनी उत्तर देताना सांगितले की, लिखाण ही सामाजिक आणि नैतिक जबाबदारी आहे याचे भान लेखकाने सुटू देता नये. घडणाऱया वयातील मुलांना साहित्य वेगळय़ा प्रकारे वळण देऊ शकते. लोकमान्य टिळकांपासून महात्मा गांधीपर्यंत सर्वांनी बदलासाठी, जागृतीसाठी लिखाण केले. आपल्या लेखनाचा प्रभाव कोणावर कसा पडेल हे सांगता येत नाही. त्यामुळे ते जबाबदारीने केले पाहिजे.
मावजो यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना दोन्ही लेखिकांनी दिलखुलास उत्तरे दिली. स्वागत आणि आभार प्रदर्शन डॉ. सुबोध केरकर यांनी केले.