प्रतिनिधी / रत्नागिरी
कोरोनाच्या वाढत्या संसर्गानं जगभरात अस्वस्थता आहे, पण याचा सर्वाधिक फटका हा गरीब, वंचित घटाकांना बसला. केवळ कोरोनाच्या साथीनेच नव्हे तर लॉकडाऊननेही मोठे नुकसान झाले. या नुकसात हातचा रोजगार जाणे, पैशांची चणचण, आरोग्याची हेळसांड, शैक्षणिक नुकसान असे अनेक कंगोरे आहेत. अशा स्वरूपाच्या समस्यांवर दीर्घकाळापासून काम करणाऱ्या स्वयंसेवा संस्थांना एकत्र बोलावून संपर्कच्या माध्यमातून नुकतेच दोन दिवसीय फेसबुक ऑनलाईन अधिवेशन यशस्वीपणे पार पडले अशा पध्दतीने ऑनलाईन अधिवेशन घेणारे संपर्क ही संस्था महाराष्ट्रातील एकमेव ठरली आहे.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या येत्या पावसाळी अधिवेशनाआधी वंचितांच्या समस्यांवर चर्चा करून, महाराष्ट्र सरकारला ठोस कृतिकार्यकम सूचविण्यासाठी संपर्क या संस्थेमार्फत महाराष्ट्रातील स्वयंसेवी संस्थांचे ऑनलाईन अधिवेशन घेण्यात आले. संपर्क संस्था आणि नवी उमेद फेसबुक पेजव्दारे आयोजित करण्यात आलेले हे संपर्क सेतू अधिवेशन १२ आणि १३ जून रोजी घेण्यात आले. विधान परिषदेच्या माजी उपसभापती आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली संपर्क सेतू अधिवेशन संपन्न झाले.
या अधिवेशनात प्रामुख्याने ग्रामीण आणि नागरि समस्या, रोजगाराचे प्रश्न, महिला बालविकास आणि सामाजिक न्याय संबंधांतील प्रश्न तसेच आरोग्य आणि शिक्षणाच्या समस्या या विषयांवर सखोल चर्चा आणि प्रश्नाेत्तरांचा समावेश होता. या ऑनलाईन अधिवेशनाचे आयोजक संपर्क संस्थेच्या मेधा कुलकर्णी, ‘पथम’ या संस्थेचा फरिदा लांबे आणि स्वयंसेवी संस्थांचे सल्लागार मिनार पिंपळे हे सहभागी झाले होते. या अधिवेशनात तज्ञ मार्गदर्शकांसह महाराष्टातील १०० हून अधिक स्वयंसेवी संस्थांचे पतिनिधीही सहभागी झाले होते.
डॉ. नीलम गोऱ्हे यांनी १४ व्या वित्त आयोग, जिल्हा नियोजन व मनरेगा येथील निधीचे विनियोजन करण्यासाठी सामाजिक संस्थांची मदत घेण्याची सूचना मांडली. एकल महिलांना तात्काळ जॉब कार्ड देवून कामे देण्याची देखील सूचना केली. आंबेगाव, लातून आणि शहादा येथे रोहयोचे काम मागितल्यानंतर धमवण्यात आले आहे त्याची चौकशी करून तेथील मजूरांना कामे देण्याची मागणी उपस्थित असलेल्या शासनाच्या अधिकाऱयांकडे नीलम गोऱ्हे यांनी केली. या अधिवेशनात रोजगार हमी योजना, शिक्षण, आरोग्य, महिला व बालकल्याणसह सामाजिक न्याय, उद्योजगता व शहरी रोजगार योजना, शेती व शेतकरी महिला व रेशन व कामगार या सात विषयांवर सविस्तर चर्चा झाली. या विषयाच्या प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे व हे पश्न मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व इतर मंत्री, सचिवांकडे आमदार नीलम गोऱ्हे संस्थांच्या मदतीने पाठपुरावा करणार आहेत. यावेळी शाश्वत विकासातील १७ उद्दीष्टे बाबतही पर्यावरण विभागाच्या जिल्हानिहाय आराखड्यात हे मुद्दे समाविष्ट करण्यासाठी पयत्न केले जातील असेही डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.
अधिवेशनाच्या दुसऱया दिवशी राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले, मनरेगा आयुक्त रांगा नायक यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये मनरेगा आणि कृषीच्या कामांबाबत चर्चाविनियम झाली. अशा पध्दतीने दोन दिवसीय अधिवेशन यशस्वीपणे पार पडल्याची माहिती संपर्क संस्थेने दिली.