प्रतिनिधी / वैराग
संपूर्ण महाराष्ट्रात अंत्य विधीसाठी सर्व समाज बांधवांना दफनभुमी, स्मशानभुमी, कब्रस्थानासाठी गावो- गावी२० गुंठे जमीन शासनाने उपलब्ध करून द्यावी. अशी मागणी मौलाना आझाद विचार मंचच्या वतीने मुख्यमंत्री, महसुल मंत्री यांना निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. याबाबत मौलाना आझाद विचार मंचचे सोलापूर जिल्हाध्यक्ष इस्माईल पटेल यांनी मुख्यमंत्री – उद्धव ठाकरे महसूल मंत्री मा. बाळासाहेब थोरात यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे, की, महाराष्ट्रातील प्रत्येक खेडे गावाला शासनाच्या नियमानुसार २० गुंठे जमीन मिळायला पाहिजे.
परंतु महसूल प्रशासन हे जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहेत. म्हणून ज्या गावांत दफनभुमी, स्मशानभुमी, कब्रस्थानला जागा नाही. तेथे जातीय तणाव वाढत आहे. त्यामुळे जिवंतपणी नाही पण माणसाची मृत्यूनंतर त्याच्या प्रेताची अवहेलना होताना दिसत आहे. तरी संपूर्ण महाराष्ट्रात अंत्य विधीसाठी गावो – गावी सर्व समाजासाठी जमीन मिळावी अशी मागणी प्रशासनाला केली आहे .