ऑनलाईन टीम/तरुण भारत
देशभरात ३१ जानेवारी ‘विश्वासघात दिवस’ म्हणून साजरा करणार असल्याची घोषणा शुक्रवारी संयुक्त किसान मोर्चाने (SKM) केली. यामध्ये जिल्हा आणि ब्लॉक स्तरावर मोठ्या प्रमाणात आंदोलन होणार आहेत. समन्वय समितीच्या बैठकीनंतर शेतकरी संघटनेच्या एसकेएमने सांगितले की, ‘आंदोलनाशी जोडलेल्या सर्व शेतकरी संघटनांनी हा विरोध मोठ्या उत्साहात करा. देशातील कमीत कमी ५०० जिल्ह्यात हा कार्यक्रम आयोजित केला जाईल, अशी आशा आहे.’ ३१ जानेवारीला होणाऱ्या आंदोलनाबाबत केंद्र सरकारला निवेदनही देण्यात येणार आहे. तसेच या बैठकीत या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.