अर्थतज्ञ जयंती घोष यांचे नाव सामील
संयुक्त राष्ट्रसंघ
संयुक्त राष्ट्रसंघाच्या 20 सदस्यीय उच्चस्तरीय सल्लागार मंडळात भारताच्या अर्थतज्ञ जयंती घोष यांचेही नाव सामीला आहे. हे सल्लागार मंडळ कोरोना महामारीनंतर जगासमोर येणाऱया आर्थिक-सामाजिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी शिफारसी करणार आहे. जयंती घोष यांनी जेएनयूत 35 वर्षांपर्यंत अर्थशास्त्राचे धडे दिले आहेत. सद्यकाळात त्या मॅसाच्युसेट्स विद्यापीठात प्राध्यापिका आहेत. अर्थशास्त्रासंबंधी त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अँड सोशल अफेयरने (युएनडीइएसए) सल्लागार मंडळाच्या 20 सदस्यांची घोषणा केली आहे. यात सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातील 20 तज्ञांची नावे सामील आहेत. हे सल्लागार मंडळ पुढील दोन वर्षांपर्यंत नेतृत्व आणि वैचारिक पातळीवर संयुक्त राष्ट्रसंघाला बळकटी देणार आहे. या मंडळाच्या विचारांचा प्रभाव संयुक्त राष्ट्रसंघाच्या धोरणांमध्ये दिसून येणार आहे. संयुक्त राष्ट्र महासचिवांना सल्ला देण्याचे कामही हे उच्चस्तरीय मंडळ करणार आहे.