ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संरक्षण क्षेत्रासाठी 4.78 लाख कोटींच्या भरीव तरतुदीची घोषणा केली. पूर्व लडाखच्या सीमेवरील भारत-चीन संघर्ष आणि युद्धाचा संभाव्य धोका लक्षात घेता यंदाच्या संरक्षण क्षेत्रातील बजेटमध्ये 7 लाख कोटींची वाढ करण्यात आली आहे.
4.78 कोटींच्या बजेटमधील 1.35 कोटी शस्त्रास्त्र खरेदीसाठी राखून ठेवण्यात येतील. महसुली खर्चासाठी 2.12 लाख कोटी रुपये तर पेन्शनसाठी 1.15 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे.