ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
आज संविधान दिनानिमित्त संसद भवनात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावर 14 विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला. त्यामध्ये काँग्रेस, समाजवादी पक्ष, आरजेडी, द्रमुक, शिवसेना, राष्ट्रवादी आणि टीएमसीसह 14 पक्षांचा समावेश आहे.
विरोधी पक्षांनी टाकेलेल्या या बहिष्कारानंतर भाजप नेते अर्जून मेघवाल म्हणाले, पन्नास वर्षांहून अधिक काळ देशावर राज्य करणारा काँग्रेससारखा पक्ष संविधान दिनावर बहिष्कार टाकत आहे. हा बहिष्कार म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान आहे. काँग्रेस फक्त आपल्या कुटुंबाशी संबंधित व्यक्तींचा सन्मान करते. इतर महापुरुषांच्या सन्मानाशी त्यांना काही देणेघेणे नाही. आम्ही प्रत्येक मुद्यावर चर्चा करण्यास तयार आहोत. मात्र, आजच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणे हा संविधानाचा अपमान आहे.